शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कमी मार्कांची भीती; वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडलं अन् घरी येऊन जीवन संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:48 IST

निकाल लागण्याच्या एक तास आधीच तृप्तीने जीवन संपविले. तृप्ती केंद्रीय विद्यालयात सीबीएसईची विद्यार्थिनी होती.

जळगाव - दहावीत पास होणारच, पण अपेक्षित गुण कमी पडणार या भीतीने तृप्ती रवींद्र साळुंखे (वय १७) या सीबीएसई दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता पिंप्राळ्यातील आनंदमित्र सोसायटीत घडली. निकाल लागण्याच्या एक तास आधीच तृप्तीने जीवन संपविले. तृप्ती केंद्रीय विद्यालयात सीबीएसईची विद्यार्थिनी होती. दुपारी निकाल जाहीर झाला. त्यात तिला ७८ टक्के गुण मिळाले आहेत.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील आनंदमित्र सोसायटीत एकमुखी दत्त मंदिराजवळ तृप्ती आई-वडिलांसह वास्तव्याला होती. भाऊ आशिष पुण्यात इंजिनिअर आहे. वडील सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते डिफेन्स सिक्युरिटी फोर्स (डीएससी) मध्ये रुजू झाले होते. ते गुवाहाटीला हवालदार पदावर कार्यरत होते. रजा संपल्यानंतर शुक्रवारी ते गीतांजली एक्सप्रेसने गुवाहाटीला जाणार होते. वडिलांना सोडण्यासाठी तृप्ती रेल्वे स्टेशनवर गेली व तेथून घरी आली. आई सविता ही बाहेर भांडी धूत होती. ते काम आटोपल्यानंतर घरात गेली असता, तृप्ती ज्या खोलीत होती त्याचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आईने शेजारच्यांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडला असता, तृप्तीने गळफास घेतल्याचे दिसले.

साखळी ओढून थांबवली रेल्वे

तृप्तीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे लक्षात येताच सविता यांनी पतीला फोन करून तत्काळ घरी येण्याचे सांगितले. तेव्हा गीतांजली एक्सप्रेसने स्थानकातून नुकतीच सुरू झाली होती. पत्नी घाबरली आहे, परंतु कारण सांगत नाही. काही तरी विपरित घटना घडल्याचा संशय आल्याने त्यांनी चालत्या गाडीची साखळी ओढून गाडी थांबवली व तेथून थेट घर गाठले. तृप्तीला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास नीलेश पाटील करीत आहेत.

चार ठिकाणी लावले होते क्लास

तृप्ती ही केंद्रीय विद्यालयात दहावीला होती. शुक्रवारी दहावीचा निकाल होता. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याने तृप्ती हिने चार ठिकाणी क्लासेस लावले होते. त्यात अकरावीच्या क्लासेसचाही समावेश होता. वडिलांनी प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे चारही क्लासेसचे एक लाख रुपये ॲडव्हान्स भरले होते. इतकी मोठी रक्कम भरली आहे. दहावीला मेहनतही खूप घेतली, तरी देखील टक्के कमी पडतील. तसे झाले तर पैसे वाया जातील, स्वप्नांचा चुराडा होईल, या तणावात आल्याने तृप्तीने निकालाच्या एक तास आधीच जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक चौकशीत हेच कारण समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

सैन्यात अधिकारी अन् डॉक्टरचे स्वप्न

तृप्ती हिने आठवीत विविध क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. वडील सैन्य दलात असल्याने आपणही याच क्षेत्रात मोठ्या पदावर अधिकारी होऊ, असे स्वप्न तिने रंगवले होते. त्यानंतर दहावीत आल्यावर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेऊन तशी तयारी केली होती, अशी माहिती वडील रवींद्र नथ्थू साळुंखे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

६ जुलैला वाढदिवस जल्लोषात

‘तृप्ती हिचा ६ जुलै रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी तिने १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबात हा वाढदिवस आनंदात साजरा झाला. आज रजा संपल्यानंतर ड्यूटीवर जायला निघालो अन् तृप्तीचा मृतदेहच दिसला. मुलांच्या भविष्यासाठी खूप केले. कोणत्याच गोष्टीची कमतरता घरात नव्हती. ती अशी अचानक निघून जाईल, असे वाटले नव्हते, हे सांगत असताना तिच्या वडिलांना अश्रू आवरता आले नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव