शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:08 IST

निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल

जळगाव : गेल्या ७० वर्षांपासून सर्वांच्या ह्रदयावर लागलेला काश्मीरातील ३७० कलमची जखम पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पुढाकाराने दूर झाली असून आगामी काळ हा काश्मीरसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत व्यक्त केला. या निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल असून तेथील जीवनमान बदलण्यास मोठी मदत होणार आहे. सोबतच तिहेरी तलाकबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने मुस्लीम भगिणी खूष आहे. त्यामुळे भविष्यात मुस्लीम बांधवच भाजपला सर्वात जास्त मतदान करतील, असा दावाही महाजन यांनी या वेळी केला.आगामी विधानसभा निवडणुकीतही नियोजन केल्यास आपले हमखास यश आहे, असे सांगत त्यांनी दोन महिने मेहनत करा, आता कच खाऊ नका, असा सल्ला उपस्थितांना दिला.नाथाभाऊ माझे पाठीराखेचपूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथराव खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. या विषयावर गिरीश महाजन यांना या बैठकीनंतर विचारले असता ते म्हणाले की, नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु, तुम्हाला माध्यमांना भलतंच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलंच झालं, अशी प्रतिक्रियाही महाजन यांनी दिली. महाजन आणि खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारं काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या.या वेळी गिरणा धरणात जळगाव जिल्ह्यातील इतर धरणांसाठी पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी निवडणूक पुढे ढकण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, त्यांना स्वायत्तता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी. तसेच पूरग्रस्तांसाठी निधीचे नियोजन केले असून तो कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मराठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांची सोय केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव