शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:08 IST

निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल

जळगाव : गेल्या ७० वर्षांपासून सर्वांच्या ह्रदयावर लागलेला काश्मीरातील ३७० कलमची जखम पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पुढाकाराने दूर झाली असून आगामी काळ हा काश्मीरसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत व्यक्त केला. या निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल असून तेथील जीवनमान बदलण्यास मोठी मदत होणार आहे. सोबतच तिहेरी तलाकबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने मुस्लीम भगिणी खूष आहे. त्यामुळे भविष्यात मुस्लीम बांधवच भाजपला सर्वात जास्त मतदान करतील, असा दावाही महाजन यांनी या वेळी केला.आगामी विधानसभा निवडणुकीतही नियोजन केल्यास आपले हमखास यश आहे, असे सांगत त्यांनी दोन महिने मेहनत करा, आता कच खाऊ नका, असा सल्ला उपस्थितांना दिला.नाथाभाऊ माझे पाठीराखेचपूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथराव खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. या विषयावर गिरीश महाजन यांना या बैठकीनंतर विचारले असता ते म्हणाले की, नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु, तुम्हाला माध्यमांना भलतंच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलंच झालं, अशी प्रतिक्रियाही महाजन यांनी दिली. महाजन आणि खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारं काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या.या वेळी गिरणा धरणात जळगाव जिल्ह्यातील इतर धरणांसाठी पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी निवडणूक पुढे ढकण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, त्यांना स्वायत्तता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी. तसेच पूरग्रस्तांसाठी निधीचे नियोजन केले असून तो कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मराठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांची सोय केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव