शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गावरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 2:38 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात साहित्यिक रवींद्र पांढरे लिहिताहेत...

बय सांगत होती, ‘गावरान तं् गावरानच राह्यतं भाऊ. अन् तुल्हे सांगू ह्या गावरानची एवढी ख्याती काहून झाली ! काहून की हे जे हायब्रीड आलं न्ं ते निकस हाये.‘गावरान’ निकस हाये तं् हाये ते खाल्लं की, जे कधी पाह्यले नही, ऐकले नही आसे नवे नवे आजार उमळ्याले लागले भाऊ. म्हणून आता लोकं म्हन्याले लागले, गावरान पाह्यजे, गावरान पाह्यजे. तसं तं् हे हायब्रीड याच्याबी आधी ह्या ‘गावरान’ले ख्याती मिळेल व्हती ती गावरानी तुपानं. काय तुप राहे भाऊ गावरानी. कणीदार, रवाळ, पिवळं धम्मक. घमघम वास ये येचा. डोळ्यात घातलं त् डोळे चमकदार अन् नजर तेज व्हये मानसाची. गाई, म्हशीले खायालेबी तसंच भेटे भाऊ. शेंगदाण्याची सरकीची ढेप खात गाई, म्हशी. तेच्यानं दुधबी तसंच निघे, कपाळाले लाव्याच्या गंधकावानी घट. मडक्यात दही लावलं तं आसं दहि लागे, खापची खाप. लोनी काढ्याले रई लावली तं् खरंडीग ताक तं् फुकट वाटून देत गल्लीत घरोघरी. आता रई लावनारी बाई म्हनली तं् एकच दिसते भाऊ, बाळक्रिस्राची माय यशोदा, तेबी चित्रात.आता पह्यल्यावानी गावरानी तुप भेटत कां भाऊ. पह्यल्या जमान्यातलं गावरानी तुप म्हनशील तं् औषीद व्हत भाऊ औषीद. गावरानी तुप खानारं मानुस कसं तिपीतिपी तळपे, सोन्यावानी पिवळ धम्मक.‘आता काय राह्यलं रे भाऊ गावरानी. गावरानी आंबा तं् डोळ्यानं दिसत नही भाऊ. किती गावरानी आंबे व्हते भाऊ आमच्या जमान्यात. बाया मानसं, पोरंसोरं इकळून जात आंबे खाऊ खाऊ.झाडच तसे व्हते भाऊ आंब्याचे शिवारात. झाडं तं् झाडं पन ‘आमराया’ बी तशाच व्हत्या मोठ्या-मोठ्या दहा-दहा, वीस-वीस झाडांच्या आंब्याचे झाडं अन् आमराया म्हनशील तं् वैभव व्हतं भाऊ शिवारच. हे मोठमोठे झाडं, पन्नास पन्नास-साठ साठ वर्साचे एका आंब्याच्या सावलीतच आख्ख गव्हार बसे गाई वासराचं वावरात काही इहिरीच्या पान्याची शांती कऱ्याची आसली म्हना, कां काही नवस आसला म्हना तं् सयपाक पानी, जेवनं खावनं समदं आमराईच्या सावलीत उरके. आताच्यावानी कापडी मांडव घाल्याचं काम पडेना.आंबे कां आंबे व्हते भाऊ गावरानी. एकापेक्षा एक नामी.नगदीला केळ्या, देवळीतला काळ्या, मळ्यातला रोपड्या अन् सांगवीची कुयरी.एकापेक्षा एक नामी आंबे गवताच्या आढीत पिकोयेल आंब्याचा रस म्हनशील नं् तं् आसा लालजरद हि गुळावानी. घटब्बी तसाच.आमरसाचं जेवन म्हनलं तं् थोरामोठ्यांची मेजवानी व्हती. बाया शेजारनी पाजारीले छाती फुगावून कौतुकानं सांगत, इहिनच्या घरी गेल्ही व्हती तं् इहिननं् मले आमरसाचं जेवन केल्हं. ‘आता ते आढीतले पिकोयेल गावरान आंबेबी राह्यले नही अन् तो जिव्हाळाबी. आता पैशा करता लोकं ते निलमी कलमी आंबे कवळे काचेच तोडता अन् औषीदं टाकून पिकवता. त्या आंब्याच्या रसाले ना रंग ना ढंग. नही खाल्लं तेवढं चांगल.गावरान काही राह्यलं नही भाऊ आता. बारा मह्यन्याचा खार घाल्याचा म्हनलं त् खार घाल्याले बी गावरान आंबा भेटत नही. बजारात कधी इचारलं की, ‘गावरान हाये कां रे भाऊ, तं् म्हनता, गावरान काय राह्यलं बय आता, गेल्हा तो तुमचा गावरानचा जमाना, आता हा हायब्रीडचा जमाना हाये.-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर