शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:50 IST

बिडगाव परिसरात केळी बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठळक मुद्देशेतकरी संकटात घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

आॅनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. २० - निम्म्याहून अधिक एप्रिल महिना उलटून तापमानात प्रंचड वाढलेले आहे. यामुळे बिडगाव परीसरात केळी बागांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करीत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपू लागली आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकºयांपुढे नवीन अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्यातील भागात केळी ही चांगली पिकत असते. त्यानुसार भरघोस उत्पादनही घेतले जाते.चोपडा तालुक्यात सद्यस्थितित जुनारी पिलबाग व काढणीवर आलेली नवतीबाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. सध्या वाढत चाललेले तापमानामुळे शेतक-यांच्या संकंटात वाढ झालेली आहे. यात पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहे. यामुळे ही घडं कवडीमोल भावातही व्यापारी घेत नाही. केळी बाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात केळी खरेदी, तापमानात वाढ ही दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपडही सुरु आहे. यात अजून खालवत चाललेली पाण्याची पातळी यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला आहे.केळी वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपडवाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाय करत धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी कपडा लावणे, विविध काड्यांचे आधार बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवेगार नेट लावत आहे. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव