शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

चोपड्यात विद्यार्थ्यांनी गोळा केला पूरग्रस्तांसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:02 IST

पाच तासात जमविली आठ हजारांची रक्कम

चोपडा, जि.जळगाव : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे झाल्याने महापुरात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोपडा शहरातील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवाभावी युवकांनी पुढाकार घेऊन मदत निधी संकलनाचे काम केले आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, प्रा.एम.बी.हांडे, प्रा.बी.एस.हडपे ,मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.शुक्रवारी पहिल्या दिवशी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ व वरिष्ठ), शिक्षण शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील परिसरात फिरून विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्यात आले.या निधी फेरीला विद्यार्थ्यांंनी आपापल्या परीने मदत केली. त्यात या विद्यार्थ्यांनी पाच तासात आठ हजार रुपयांचा निधी गोळा केला आहे. प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संदीप भास्कर पाटील, प्रा.एम.एल.भुसारे, प्रा.शैलेश वाघ, प्रा.डी.एस.पाटील यांच्या सहकार्यातून महाविद्यालयीन प्रतिनिधी अनिल बाविस्कर, लोकेश लाटे, चेतन बाविस्कर, अक्षय पाटील, भुवनेश्वरी पाटील, सनी पाटील, अक्षय वैद्य, नरेंद्र मैराळे, कामिल तडवी, विश्वनाथ चौधरी, तन्वीर पिंजारी, भूषण सोनवणे, दिनेश पाटील, सिकंदर तडवी, लीलाधर बाविस्कर, छाया काविरे, शुभम तडवी यांनी निधी संकलनाचे काम केले.२५ रोजी शहरातील मुख्य बाजारात निधी संकलनासाठी फेरी काढण्यात येणार आहे.नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन युवकांनी केले आहे.दरम्यान, सर्व निधी संकलन झाल्यानंतर केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे.

टॅग्स :RainपाऊसChopdaचोपडा