शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उपासनेचे फळ : रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:04 IST

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा ...

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा आनंद येतो तेव्हा तो समाधानी असतो. वर्षभरात आम्ही काही सण साजरा करतो जे आपल्या आनंदाचे स्रोत असतील? जेव्हा आम्ही आपल्या जीवनात सर्व प्रकारची चिंता आणि आर्थिक जबाबदाऱ्यांपासून काही क्षण मुक्त राहून आनंदाची वेळ घालवतो, त्याला सण म्हणतात. आपल्या जीवनात आनंदाचे सण साजरी करणे याचा मोलाचा स्थान आहे.ईदुल-फित्र हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा मोठा उत्सव आहे, जो दरवर्षी रमजान महिन्याच्या उपवासानंतर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद नक्कीच आनंदाचा सण आहे पण यंदाच्या ईदमध्ये आपल्याला जबाबदार वृत्ती आणि दृढनिश्चयाने कोरोना महामारीला धैर्याने तोंड देण्याची आहे. जीवनात अनेक समस्या उद्भवतात, परंतु यामुळे निराश होता कामा नये. अशा परिस्थितीत काही लोक असे म्हणत आहेत की, आम्ही ईद साजरी करणार नाही. या विचारसरणीमागे देशप्रेम आणि मानवतेचा भाव आहे.ईद हा आपल्या महिन्याभराच्या उपासनेबद्दल अल्लाहचे समोर नतमस्तक होउन आभार मानण्याचा दिवस आहे. ईद हा आपल्या गरीब बांधवांना मदत करण्याचा दिवस आहे. गरजू लोकांना आधार देण्याचा दिवस आहे. प्रेम सामायिक करण्याचा आणि तुटलेला संबंध जोडण्याचा दिवस आहे. या दिवशी आनंद व्यक्त करणे ही शरीयतची आज्ञा आहे. चांगले कपडे घालणे, सुगंध लावणे आणि गोड खाणे ही आपली परंपरा आहे. आपण बाजारात गेलो नाही, हे चांगले केले. वाचवलेले पैसे त्यांच्यावर खर्च करुन ईद साजरी करा ज्यांच्याकडे अद्याप औषध आणि खाण्यासाठी पैसे नाहीत. यापूर्वी तुम्ही अनेकवेळा ईद साजरी केली असेल. यंदाची ईद आपल्या जीवनाची पहिली आणि अनोखी ईद असेल. कारण दुसऱ्यांच्या आनंदासाठी त्याग करण्याचे सुख वेगळे असतात. आपल्याला नक्कीच मानसिक शांती आणि आत्मिक समाधानचा अनुभव मिळेल. कोरोना रूग्णांना आपल्या आनंदाचा एक भाग बनवा. त्यांचा द्वेष करु नका, त्यांच्याशी भेदभाव करू नका. त्यांना मदत करा. ज्यांचे प्रियजन या आजाराने ग्रस्त आहेत त्यांचे सांत्वन करा. या आनंदमय दिवशी घरीच नव्हे तर रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात ज्यांनी आपले प्रियजन हरवले आहे, त्यांचे दु: ख सामायिक करण्याचा प्रयत्न करा. टाळेबंदीने दारिद्र्य आणि बेरोजगारीलाही तीव्र केले आहे. त्यापासून प्रभावित लोकांना आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे? ईदचा हादेखील महत्त्वाचा हेतू आहे. म्हणूनच ईदच्या नमाजच्या आधी सदाका-ए-फित्र अदा करण्यावर भर देण्यात आला आहे .आपण आपल्या गरीब शेजाºयांना आणि गरीब नातेवाईकांना ईदच्या आनंदात सहभागी केल्याशिवाय ईद साजरा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ईदच्या दिवशी लोकांना नक्की भेटा परंतु थोड्या अंतरावर. पण हे अंतर मनाचे अंतर होऊ देऊ नका. आनंदी व्हा आणि लोकांसह आनंदात सहभागी व्हा .ईदच्या या आनंदमय दिवशी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा.-काजी मुजम्मिलोद्दीन नदवी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव