शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पहूरचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:34 IST

वाघूर धरणातून पाणीपुरवठा

पहूर, जि. जळगाव : गंभीर पाणी समस्येस तोंड देणाऱ्या पहूर गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला असून येथील पाणीपुरवठ्यासाठी वाघूर धरणावरून पाणी उचलण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या सोबतच वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून वाघूर जलाशयातून पाणी उचलण्याकरीता मंजुरी दाखलादेखील दिला आहे.चार वर्षांपासून पाठपुरावापहूर कसबे येथे सध्या तब्बल २५ दिवसाआड व तर पेठ गावाला पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कसबे व पेठ गावात पिण्याच्या पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. वाघूर धरणावरून वरील दोन्ही गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर २०१५पासून समितीमार्फत पाठपुरावा केला जात आहे.सर्वेक्षणाकरीता निधी उपलब्धमागील महिन्यात सर्वेक्षणाकरीता निधी उपलब्ध झाला असून तसेच वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून वाघूर जलाशयातून पाणी उचलण्याकरीता मंजुरी दाखला देण्यात आला. या जागेची पाहणी जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता बी.जी.पाटील यांच्यासह समितीचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे, राजधर पांढरे उपसरंच योगेश भडांगे, शरद पांढरे, लक्ष्मण गोरे, समाधान पाटील, संदीप बेढे, भारत पाटील, अर्जुन लाहसे, प्रदिप जाधव, राजाराम बनकर यांनी पाहणी केली.असे आहे नियोजनपहूर गावाला बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी धरणात शेवटपर्यंत पाण्याचा स्त्रोत असणाºया ठिकाणी म्हणजेच मुख्य जलाशलायाच्या पश्चिम बाजूला कंडारी गावाच्या दिशेने विहिरीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी विहिर खोदून त्या विहिरीतून पाणी उचलण्यात येणार असून गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. यानंतर वाघूर धरण ते पहूर गाव यादरम्यान पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव