शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राजधानी दिल्लीत दरवळणार चाळीसगावातील मातीचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 15:05 IST

राजधानी दिल्लीत चाळीसगावातील मातीचा सुगंध दरवळणार आहे.

ठळक मुद्देस्व. मेजर जनरल अ. वि. नातूंचा सन्मानमेजर जनरल अ. वि. नातू यांच्या घराची व शेतातील माती कलशात घेऊन ही यात्रा पुढील प्रवास करणार

चाळीसगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रज्वलीत झालेली स्वर्णिम विजय मशाल यात्रा गुरुवारी सायंकाळी शहरात आगमन होताच शहरवासीयांकडून यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताने यात्रेसोबत आलेले सैन्य दलातील अधिकारी अक्षरशः भारावले. या यात्रेच्या निमित्ताने देशभक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी येथील रहिवासी तथा भारत सरकारच्या महावीर चक्राने सन्मानीत स्वर्गीय मेजर जनरल अ. वि. नातू यांच्या शेतासह निवासस्थानातील माती कलशातून दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी नेण्यात आली.औरंगाबाद येथून सकाळी सव्वादहाला कन्नड बायपास रस्त्यावर यात्रेचे आगमन झाले. त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे सपोनि प्रकाश सदगीर, सहकारी, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी स्वागत करुन यात्रेला शहरात आणले. सिग्नल चौकात स्वर्णिम विजय मशाल यात्रा आल्यानंतर मिरवणुकीने  य. ना. चव्हाण महाविद्यालयात स्वागताचा जाहीर  कार्यक्रम झाला. मिरवणुकीच्या अग्रभावी एनसीसी, एनएसएस, स्काऊट- गाईडच्या विद्यार्थी सहभागी झाले होते. बॅन्डच्या तालावर देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अरुण निकम, कृषी उपायुक्त अनिल भोकरे, लेफ्टनंट कमांडंट गुलबक्षी काळे, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, चित्रसेन पाटील, जळगाव माजी सैनिक कल्याणच्या प्रतिभा चव्हाण, उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या प्रतिभा चव्हाण, किसनराव जोर्वेकर, डॉ. महेश पाटील, डॉ.सुनील राजपूत आदी उपस्थित होते.यात्रेसोबत आलेले कॅप्टन आकाश माने यांनी चाळीसगावकरांच्या स्वागताने आपण भारावलो असून आजपर्यंतचा सर्वाधिक भव्यदिव्य असा हा स्वागत सोहळा असल्याचे सांगितले. १६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या यात्रेची सुरवात झाली असून १९७१ मध्ये परमवीर चक्राने ज्या वीरपुत्रांना सन्मानीत करण्यात करण्यात आले, त्यांचा राष्ट्रीय सन्मान करण्याचा मशाल यात्रेचा उद्देश आहे. ही यात्रा दक्षिण दिशेवरुन दिल्ली, आग्रा, भोपाळ, इटारसी, नागपूर, औरंगाबाद येथून चाळीसगावला आली. येथील स्वर्गीय मेजर जनरल अ. वि. नातू यांच्या घराची व शेतातील माती कलशात घेऊन ही यात्रा आपला पुढील प्रवास हैदराबाद, कोची, अंदमान-निकोबारकडे कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी साक्षी ठोंबरे हिने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. प्रशांत पोतदार यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संगीता देव यांनी सूत्रसंचालन तर ब्रिगेडीयर विजय नातू यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव