शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:17 PM

वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

ठळक मुद्देदुसºया टप्प्याचे केवळ गाजरच

जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्यात येणार असून,यासाठी ६२ कोटी रुपयांची निविदा देखील काढण्यात आली आहे. मात्र, शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्यामुळे आता समांतर रस्त्यांची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर समांतर रस्ते अशक्यच असल्याची धक्कादायक माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ शी खासगीत बोलताना दिली.त्यामुळे सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून समांतर रस्त्यांबाबत देण्यात येणारे आश्वासन केवळ पोकळ असल्याचीही माहिंती अधिकाºयांनी दिली आहे. समांतर रस्त्याच्या मागणीसाठी संमातर रस्ते कृती समिती व नागरिकांकडून दबाव असल्याने शहरातील महामार्गाच्या चौपदीकरणानंतर समांतर रस्त्यांचे काम केले जाणार असल्याचे खोटे आश्वासन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत असल्याचीही माहिती या अधिकाºयांनी दिली आहे.पाईपलाईन स्थलांतराच्या सूचना नाहीसमांतर रस्त्यांचे काम करण्याचा विचार प्रशासनाचा राहिला असता तर मनपाला समांतर रस्त्यांच्या कामासाठी अडचणीची ठरणारी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार होती. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत मनपाला हे काम १५ दिवसांच्या आतच करावे लागणार होते. मात्र, या बैठकीला दोन महिने होवून देखील हे काम झालेले नाही. याबाबत मनपाचे शहर अभियंता डी.एस.खडके यांना विचारले असता, याबाबत ‘नही’ कडून कोणतेही पत्र मनपाला मिळालेले नाही, चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईनचा अडथळा ठरत नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.समांतर रस्ते न होण्यामागचे कारण1 ६२ कोटी रुपयांमधून राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शहरात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरून होणारी बरीचशी वाहतूक नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे समांतर रस्ते तयार करण्याची आवश्यकता नसल्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.2 वर्षभरातच शहराबाहेरून बायपासचे काम होणार आहे. त्यामुळे शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया वाहतुकीची वर्दळ ६० टक्कयांनी कमी होणार आहे. त्यातच शहरातील महामार्गाचे चौपदीकरण झाल्यास महामार्गावर सध्याचा घडीला निर्माण होणरी वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच समांतर रस्त्यांचे काम केले जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.चौपदरीकरणासाठी निविदेला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढचौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात होणाºया कामासाठी ६२ कोटी रुपयांची निविदेला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता १० फेब्रुवारीपर्यंत या निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिंती ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.