शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत"

By अमित महाबळ | Updated: April 30, 2023 17:13 IST

जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

जळगाव : भारतीय विद्यार्थी मु‌ळातून हुशार असतात. त्यांना देश-विदेशात अनेक क्षेत्रात संधी आहेत. पण आता जगाला तुमची जात, धर्म याच्याशी देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवे आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. ते रविवारी, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

पतपेढीतर्फे आदर्श शिक्षक व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश पाटील होते, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड होते. आर. एच. बाविस्कर, संभाजी पाटील, साधना लोखंडे, पुष्पा पाटील, संजय खंबायत, पतपेढीचे पदाधिकारी व संचालक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, की जगातील सात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे सीईओ हे भारतीय व्यक्ती आहेत. भारताची लोकसंख्या १४२ कोटी झाली आहे. तिचा कसा चांगला उपयोग करून घेता येईल हे ठरवले पाहिजे. बलशाली भारत होण्यासाठी सरकारला शिक्षण क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यावरील खर्च वाढवावा लागेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पण राज्यात खासगी आणि जि. प. शाळांमधील विद्यार्थी, असे दोन वर्ग तयार झाले आहेत. त्यांच्यातील तफावत दूर झाली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. तांबे यांनी व्यक्त केली. 

खासदार उन्मेश पाटील यांनी कॉलेजमध्ये पुस्तकी ज्ञान मिळाले मात्र, प्रत्यक्ष अनुभव हा १० महिन्यांच्या नोकरीत मिळाला. आताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती दिली. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मुलाखती घ्याव्यात. त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. आमदार किशोर दराडे यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली. नीळकंठ गायकवाड यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालक व्हावे. त्यांना वेळोवेळी मदत करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात आदर्श शिक्षक डॉ. विलास नारखेडे आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  

पुढील महिन्यापासून अभ्यासिका, निवास व्यवस्थाप्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस. डी. भिरुड यांनी केले. पुढील महिन्यापासून संस्थेच्या नवीन वास्तूत अभ्यासिका आणि बाहेरगावहून येणाऱ्या संस्थेच्या सभासदांसाठी निवास व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन वैशाली महाजन, शैलेंद्र महाजन यांनी केले. स्वागत गीत राजू व संजय क्षीरसागर यांनी सादर केले. आभार संजय सांगडकर यांनी मानले.

  

टॅग्स :Jalgaonजळगाव