शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

भुसावळच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा चेतना फलक यांना दोन वर्षांचा साधा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:44 IST

माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

ठळक मुद्देजळगाव येथील ग्राहक न्यायमंचचा निकालठेवीदारांचे पैसे परत न देणे भोवले

भुसावळ, जि.जळगाव : येथील माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा आदेश जळगाव येथील ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने सोमवारी दिला आहे. त्यामुळे शहरात पतसंस्था संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे अद्यापही कारागृहात आहे. त्यात ग्राहक न्यायमंचाने दुसऱ्या संस्थेसंदर्भात दिलेल्या निकालामुळे पतसंस्थाचालकांना चांगलाच धक्का बसला आहे.अशोक रामचंद्र भोगे (रा.विद्युत कॉलनी, प्लॉट नंबर नऊ, शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय गेटजवळ, जळगाव) यांनी येथील विठ्ठल रुक्माई अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटीमध्ये १६ आॅगस्ट २००९ रोजी नऊ लाख ६८ हजार ४५० रुपये मुदत ठेवीसाठी ठेवले होते. त्यांच्या रकमेची मुदत १६ आॅगस्ट २०११ रोजी संपली. त्यावेळी त्यांना पतसंस्थेने ११ लाख ४२ हजार ७७१ रुपये देणे गरजेचे होते. संस्थेकडे मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे भोगे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार (अर्ज क्रमांक २८२/१६) १ फेब्रुवारी २०१७ रोजी याचिका दाखल केली. मात्र याचिकेतील सामनेवाले नगरपालिकेच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना फलक, तत्कालीन व्यवस्थापक प्रमोद किसन चौधरी व व्यवस्थापक दिनेश कोलते यांनी २२ डिसेंबर २०१६ रोजी ग्राहक तक्रार आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे कलम २७ ग्राहक संरक्षण आदी नियमान्वये चौकशी अर्ज दाखल करण्यात आला. या आधारानुसार आरोपींना १ फेब्रुवारी २०१७ रोजी मंचच्या आदेश पूर्ततेकामी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले. मात्र या आदेशाचेही पालन केले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे पैसे परत केल्याचे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे मुदतठेव २४ आॅक्टोबर २०१८ पर्यंत १७ लाख ७७ हजार ४६ रुपये त्यांच्या खातेवर दिसून आली, तर आरोपींनी मंचच्या कलम १२ अन्वये आदेशास स्थगिती घेतली नाही.ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २७ अन्वये या प्रकरणात तीनही आरोपी शिक्षेस पात्र असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्राहक तक्रार मंचमध्ये २२ डिसेंबर २०१६ रोजी अंमलबजावणी करण्यास कसूर केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना दोन वर्षे साधा तुरुंगवास व १० हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी वाढीव सहा महिने साधा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अध्यक्ष उमेश जावडेकर, पूनम मलिक व सुरेश जाधव यांनी दिला आहे.दरम्यान, येथे १० वर्षांपूर्वी बहुतांशी पतसंस्थांनी पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या रकमा हडप केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. अनेक ठेवीदार देशोधडीला लागले आहे. त्यामुळे हा निकाल ठेवीदारांसाठी दिलासादायक असून पतसंस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे हे वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यातच विठ्ठल रुक्माई पतसंस्थेचे चेअरमन व दोन व्यवस्थापकांना ग्राहक मंचने जोरदार धक्का दिल्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.वरिष्ठ न्यायालयात अपील करणार-फालकदरम्यान, पतसंस्थेचे चेअरमन चेतना फलक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पती संजय फालक यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वडिलांची ठेव मात्र मुलाच्या नावावर कर्ज आहे. त्यामुळे मुलाच्या नावावरील कर्जफेड करून देता येणार असल्याने तडजोड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ