शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

भुसावळच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा चेतना फलक यांना दोन वर्षांचा साधा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:44 IST

माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

ठळक मुद्देजळगाव येथील ग्राहक न्यायमंचचा निकालठेवीदारांचे पैसे परत न देणे भोवले

भुसावळ, जि.जळगाव : येथील माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा आदेश जळगाव येथील ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने सोमवारी दिला आहे. त्यामुळे शहरात पतसंस्था संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे अद्यापही कारागृहात आहे. त्यात ग्राहक न्यायमंचाने दुसऱ्या संस्थेसंदर्भात दिलेल्या निकालामुळे पतसंस्थाचालकांना चांगलाच धक्का बसला आहे.अशोक रामचंद्र भोगे (रा.विद्युत कॉलनी, प्लॉट नंबर नऊ, शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय गेटजवळ, जळगाव) यांनी येथील विठ्ठल रुक्माई अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटीमध्ये १६ आॅगस्ट २००९ रोजी नऊ लाख ६८ हजार ४५० रुपये मुदत ठेवीसाठी ठेवले होते. त्यांच्या रकमेची मुदत १६ आॅगस्ट २०११ रोजी संपली. त्यावेळी त्यांना पतसंस्थेने ११ लाख ४२ हजार ७७१ रुपये देणे गरजेचे होते. संस्थेकडे मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे भोगे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार (अर्ज क्रमांक २८२/१६) १ फेब्रुवारी २०१७ रोजी याचिका दाखल केली. मात्र याचिकेतील सामनेवाले नगरपालिकेच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना फलक, तत्कालीन व्यवस्थापक प्रमोद किसन चौधरी व व्यवस्थापक दिनेश कोलते यांनी २२ डिसेंबर २०१६ रोजी ग्राहक तक्रार आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे कलम २७ ग्राहक संरक्षण आदी नियमान्वये चौकशी अर्ज दाखल करण्यात आला. या आधारानुसार आरोपींना १ फेब्रुवारी २०१७ रोजी मंचच्या आदेश पूर्ततेकामी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले. मात्र या आदेशाचेही पालन केले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे पैसे परत केल्याचे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे मुदतठेव २४ आॅक्टोबर २०१८ पर्यंत १७ लाख ७७ हजार ४६ रुपये त्यांच्या खातेवर दिसून आली, तर आरोपींनी मंचच्या कलम १२ अन्वये आदेशास स्थगिती घेतली नाही.ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २७ अन्वये या प्रकरणात तीनही आरोपी शिक्षेस पात्र असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्राहक तक्रार मंचमध्ये २२ डिसेंबर २०१६ रोजी अंमलबजावणी करण्यास कसूर केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना दोन वर्षे साधा तुरुंगवास व १० हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी वाढीव सहा महिने साधा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अध्यक्ष उमेश जावडेकर, पूनम मलिक व सुरेश जाधव यांनी दिला आहे.दरम्यान, येथे १० वर्षांपूर्वी बहुतांशी पतसंस्थांनी पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या रकमा हडप केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. अनेक ठेवीदार देशोधडीला लागले आहे. त्यामुळे हा निकाल ठेवीदारांसाठी दिलासादायक असून पतसंस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे हे वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यातच विठ्ठल रुक्माई पतसंस्थेचे चेअरमन व दोन व्यवस्थापकांना ग्राहक मंचने जोरदार धक्का दिल्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.वरिष्ठ न्यायालयात अपील करणार-फालकदरम्यान, पतसंस्थेचे चेअरमन चेतना फलक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पती संजय फालक यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वडिलांची ठेव मात्र मुलाच्या नावावर कर्ज आहे. त्यामुळे मुलाच्या नावावरील कर्जफेड करून देता येणार असल्याने तडजोड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ