शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:31 IST

स्तुत्य : निसर्ग हाच परमेश्वर- साहेबराव पाटलांनी राजवडमध्ये नटवली हिरवळ आणि जलसंपदा

संजय पाटील ।अमळनेर : एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र अवघ्या १४ फुटांवर विहिरीला पाणी असून सर्वत्र हिरवळ आहे.माळरान असलेल्या गावात साहेबराव धोंडू पाटील यांनी निसर्ग हाच परमेश्वर मानून गावात शेळी बंदी, चराई बंदी, कुºहाड बंदी केली आणि संपूर्ण शिवरातून गाजर गवत निर्मूलन केले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या झाडे झुडपे यांच्या वाढीस चालना मिळाली. यासह झाडे लावल्यास वाहून जाणारे पाणी झाडे अडवून जमिनीत सिंचन वाढून विहिरींची पाणी पातळी वाढेल म्हणून त्यांनी स्वत:च्या २५ एकर शेतीत कापूस, ज्वारी, बाजरी, केळी, ऊस, डाळिंब, संत्रा, आंबे अशी वार्षिक उत्पन्न देणारी पिके न घेता ११ हजार सागवानी झाडे लावली. सागाच्या झाडांचे उत्पन्न १५ वर्षांनंतर मिळेल परंतु झाडांमुळे पर्यावरण संतुलन राखले गेले. यासह रस्त्याच्या दुतर्फा निंबाची झाडे लावली आहेत. परराज्यातून, प्रांतातून येणाºया धनगर, काठेवाडी यांच्या गुरांना गावात प्रवेश बंदी व चरायला बंदी घातल्याने परिसरात हजारो झाडे वाढली असून, स्वत:च्या शेतात नाला खोलीकरण, बांध बांधून शेततळे केल्याने वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले आहेत. तसेच नाल्याच्या बांधावरदेखील वृक्ष लागवड केल्याने पावसाचे पाणी गाव शिवारात जिरवण्यात आले आहे.१या उपक्रमासाठी त्यांनी शासनाचीदेखील मदत घेतली. विविध उपक्रम स्वखर्चाने राबवल्याने शासनाने गावाला आदर्श गाव, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, त्यांना वनश्री, कृषिभूषण तर पत्नी पुष्पलता पाटील यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, पर्यावरण विकास रत्नसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन संतुलन करण्यासाठी नशा बंदी, व्यसनमुक्ती, कोंडवाडा, शेणमक्ता बंदी केली. त्यामुळे गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वछता, राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.२शेजारच्या गावांना रुक्ष वाळवंट दिसत असून पाणीटंचाई, टँकरची गरज पडत असताना मात्र राजवड येथे असंख्य झाडे लावल्याने गेल्या चार वर्षांपासून हिरवळ आहे आणि विहिरींना अवघ्या १४ फुटांवर पाणी आहे. मेच्या कडक उन्हाळ्यात तीन किलोमीटर अंतरावरून गावाला पाणीपुरवठा करूनदेखील विहिरीचे पाणी वनशेतीला दिले जाते. झाडांमुळे परिसरात पाऊसदेखील चांगला पडतो. त्यामुळे सिंचनही वाढत आहे.