शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:31 IST

स्तुत्य : निसर्ग हाच परमेश्वर- साहेबराव पाटलांनी राजवडमध्ये नटवली हिरवळ आणि जलसंपदा

संजय पाटील ।अमळनेर : एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र अवघ्या १४ फुटांवर विहिरीला पाणी असून सर्वत्र हिरवळ आहे.माळरान असलेल्या गावात साहेबराव धोंडू पाटील यांनी निसर्ग हाच परमेश्वर मानून गावात शेळी बंदी, चराई बंदी, कुºहाड बंदी केली आणि संपूर्ण शिवरातून गाजर गवत निर्मूलन केले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या झाडे झुडपे यांच्या वाढीस चालना मिळाली. यासह झाडे लावल्यास वाहून जाणारे पाणी झाडे अडवून जमिनीत सिंचन वाढून विहिरींची पाणी पातळी वाढेल म्हणून त्यांनी स्वत:च्या २५ एकर शेतीत कापूस, ज्वारी, बाजरी, केळी, ऊस, डाळिंब, संत्रा, आंबे अशी वार्षिक उत्पन्न देणारी पिके न घेता ११ हजार सागवानी झाडे लावली. सागाच्या झाडांचे उत्पन्न १५ वर्षांनंतर मिळेल परंतु झाडांमुळे पर्यावरण संतुलन राखले गेले. यासह रस्त्याच्या दुतर्फा निंबाची झाडे लावली आहेत. परराज्यातून, प्रांतातून येणाºया धनगर, काठेवाडी यांच्या गुरांना गावात प्रवेश बंदी व चरायला बंदी घातल्याने परिसरात हजारो झाडे वाढली असून, स्वत:च्या शेतात नाला खोलीकरण, बांध बांधून शेततळे केल्याने वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले आहेत. तसेच नाल्याच्या बांधावरदेखील वृक्ष लागवड केल्याने पावसाचे पाणी गाव शिवारात जिरवण्यात आले आहे.१या उपक्रमासाठी त्यांनी शासनाचीदेखील मदत घेतली. विविध उपक्रम स्वखर्चाने राबवल्याने शासनाने गावाला आदर्श गाव, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, त्यांना वनश्री, कृषिभूषण तर पत्नी पुष्पलता पाटील यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, पर्यावरण विकास रत्नसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन संतुलन करण्यासाठी नशा बंदी, व्यसनमुक्ती, कोंडवाडा, शेणमक्ता बंदी केली. त्यामुळे गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वछता, राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.२शेजारच्या गावांना रुक्ष वाळवंट दिसत असून पाणीटंचाई, टँकरची गरज पडत असताना मात्र राजवड येथे असंख्य झाडे लावल्याने गेल्या चार वर्षांपासून हिरवळ आहे आणि विहिरींना अवघ्या १४ फुटांवर पाणी आहे. मेच्या कडक उन्हाळ्यात तीन किलोमीटर अंतरावरून गावाला पाणीपुरवठा करूनदेखील विहिरीचे पाणी वनशेतीला दिले जाते. झाडांमुळे परिसरात पाऊसदेखील चांगला पडतो. त्यामुळे सिंचनही वाढत आहे.