शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

ज्या भागात जे पिकते ते खा व सदृढ आयुष्य जगा - आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:25 IST

खाद्य कला, व्यायाम, पुरेशी झोप, योग्य वजन व आहार हीच निरोगी आयुष्याची पंचसूत्री

जळगाव : कोणत्या पदार्थातून किती ‘प्रोटीन, व्हिटॅमीन, कार्बोहायड्रेड, कॅलरीज’ मिळेल याचा विचार न करता दररोज डाळ, भात, भाकरी, पोळी, फळ आणि स्थानिक पदार्थासह त्या-त्या हंगामात येणारे व घरात पारंपारिकरित्या तयार होणाऱ्या आहाराचे सेवन केल्यास प्रत्येक व्यक्ती सदृढ आयुष्य जगू शकते, असा सल्ला प्रसिद्ध आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी रविवारी जळगावात दिला.स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २५ नोव्हेंबर रोजी कांताई सभागृहात ‘आरोग्यम् धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना दिवेकर यांनी हा सल्ला दिला. या वेळी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, डॉ. भावना जैन, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दिपिका चांदोरकर उपस्थित होते.घरातील वजन काटा घालवासदृढ आरोग्यासाठी वजन कमी केले पाहिजे, असा हल्ली समज झाला आहे. त्यामुळे जो-तो वजन कमी करण्याच्या मागे लागला असून घरी सारखे-सारखे स्वत:चे वजन करीत असतो. तसे न करता आपण स्वत:च आपले वजन ओळखा. काम केल्यानंतरही ज्याचे हात-पाय दुखत नाही, तणाव येत नाही, कोणी काही बोलले तरी शांत राहू शकतो अशी ज्याची लक्षणे आहे त्या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे असे समजा, असे निरोगी शरीराचे साधे गणित दिवेकर यांनी या वेळी मांडले. घरात दर आठवड्याला पूर्वी रद्दी मोजली जायची, आता आपण स्वत:ला मोजतो, त्यामुळे आपण कोण आहे, हे ओळखा व घरातील वजन काटा आधी विकून टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.शेती, स्वयंपाक घर व आजी यांचे नाते जोडाप्राणी जातीमध्ये ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच मानवाला आज खाण्याच्या-पिण्याच्या बाबतीत मार्गदर्शन घ्यावे लागते. इतर कोणत्याही प्राण्याला ‘डायट’ करावे लागले का, असा प्रश्न दिवेकर यांनी उपस्थित केला. खाण्या-पिण्याच्या बाबतीत ज्या भागात जे पिकते अर्थात स्थानिक पदार्थ सेवन करण्यासह प्रत्येक हंगामातील खाद्य व घरात आपली जी संस्कृती आहे ते पदार्थ सेवन करा आणि उत्तम आरोग्याचे धनी व्हा, असा सल्लाही त्यांनी योग्य आहारासंदर्भात दिला. यात शेती, स्वयंपाक घर आणि घरातील आजी यांचे नाते जोडून आहार घेतल्यास आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती सदृढ राहू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आपली खाद्य संस्कृती भविष्याचा वेध घेणारीआपल्याकडे पिकणारे ऊस, हळद-दूध, केळी, मका हे खाणे आपण विसरत चाललो आहे, मात्र हेच पदार्थ सेवन केल्यास त्याचे गुणकारी घटक किती फायदेशीर आहे, हे बाहेरून येऊन व पैसे घेऊन कोणी सांगितले तर आपल्याला त्याचे मोल कळते, अशी खंतही दिवेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणत्या पदार्थात किती जीवनसत्व व इतर काय-काय आहे याचा विचार न करता तो जो पदार्थ आहे, तोच पदार्थ म्हणून त्याचे सेवन करा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्याकडील प्रत्येक खाद्य पदार्थाने शरीरास मोठे फायदे होतात. आपल्या या खाद्य संस्कृतीमुळेच प्रत्येकाचे भविष्य निरोगी राहू शकते, असेही दिवेकर यांनी नमूद केले. खाणे हीदेखील एक कला असून ती संभाळा, असेही आवाहन त्यांनी केले.योग्य व्यायाम कराव्यायाम करतानाही तो किती वेळ व कोणता करावा या विषयी मार्गदर्शन करताना दिवेकर म्हणाल्या की, सायकल चालविणे, पोहणे (जलतरण), सूर्यनमस्कार, चालणे व विविध आसने असे नियमित व्यायाम केल्यास शरीराचे वजनही वाढत नाही, असे सांगत स्वत:चे काम स्वत: करा, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका, असा सल्लाही दिवेकर यांनी दिली. धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ देता येत नाही, असे प्रत्येक जण म्हणतो, मात्र दररोज थोडातरी वेळ यासाठी काढा, असेही दिवेकर म्हणाल्या.रात्री साडे आठनंतर टिव्ही, मोबाईल करा बंदसदृढ आरोग्यासाठी पुरेसी झोपही महत्त्वाची आहे, मात्र हल्ली टिव्ही, मोबाईल यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या असल्याचे दिवेकर म्हणाले. त्यामुळे घरात रात्री साडे आठ वाजेनंतर टिव्ही, मोबाईलचा वापर टाळा व घरात संवाद वाढविण्यासह पुरेसी झोप घ्या, यातून प्रत्येक व्यक्ती निरोगी आयुष्य जगू शकले, असा सल्ला त्यांनी दिला. शेवटी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दिवेकर यांनी उत्तरे दिला.दीपक चांदोरकर यांनी प्रास्ताविक केले तर अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.या वेळी वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींसह विद्यार्थी व महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ऋजुता दिवेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव