शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पाचशे, दोन हजारच्या नोटांचा उडतोय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST

जळगाव : चलनी नोटा खराब झाल्यानंतर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये सुविधा आहे. मात्र आता खराब नोटांसोबत काही नोटांचा रंगही ...

जळगाव : चलनी नोटा खराब झाल्यानंतर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये सुविधा आहे. मात्र आता खराब नोटांसोबत काही नोटांचा रंगही उडत असल्याने त्यादेखील बदल करण्यासाठी या नोटा बँकांमध्ये जमा केल्या जात आहे. यात पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. बँकांकडून ग्राहकांना नोटा लगेच बदलून दिल्या जात असल्या तरी बँकांकडून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर नवीन नोटा येण्यास अधिक वेळ लागत असल्याचे चित्र आहे.

पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा

१) तसे पाहता कोणतीही नोट कितीही खराब झाली तरी बदलून दिली पाहिजे, असे आयबीआयचे धोरण आहे. यासाठी क्लीन नोट पॉलिसीच असून त्यानुसार ग्राहकांना त्याचा लाभ दिला जातो.

२) आता नोटा खराब होण्यासोबतच त्यांचा रंगही उडत असल्याच्या तक्रारी आहे. यात अधिक प्रमाण ५०० व दोन हजारांच्या नोटांचे आहे. या नोटा बँकांमध्ये जमा केल्यानंतर ग्राहकांना त्या बदलून मिळतात.

नोटा बदलून येण्यास लागतो वेळ

- बँकांकडे ज्या नोटा जमा होतात, त्या बदलून मिळण्यासाठी ‘करंसी चेस्ट’ (खराब नोटा एकत्रित करून त्या रिझर्व्ह बँकेला पाठविणे) ज्या बँकेत असेल तेथे पाठविल्या जातात.

- जळगावात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करंसी चेस्ट आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद, नाशिक येथे तर बँक ऑफ इंडिया नाशिक येथे खराब नोटा करंसी चेस्टकडे पाठवित असतात.

- करंसी चेस्टकडे खराब, रंग उडालेल्या नोटा जमा झाल्यानंतर त्या एकत्रित करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठविल्या जातात.

- एक किंवा दोन अशा सुट्या नोटा पाठविता येत नसल्याने त्यांचे पाकीट तयार होईपर्यंत किमान १०० नोटांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अगोदरच वेळ जातो. त्यात आरबीआयकडे नोटा गेल्यानंतर त्या नष्ट करून नवीन नोटा येण्याच्या प्रक्रियेतही अधिक वेळ जातो.

————————-

नोटा कितीही खराब झाल्या तरी त्या बँकांकडून बदलून दिल्या जातात. आता नोटांचा रंग उडाल्याची तक्रार असली तरी त्या बदलून मिळतात. शिवाय ज्या नोटांना बाहेरचा रंग लागलेला असतो, त्यादेखील बदलून मिळतात. यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत नाही.

- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

आरबीआयच्या धोरणानुसार ग्राहकांना नोटा बदलून दिल्या जातात. यात कोणाची अडवणूक होत नाही. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे धोरणच असून त्यानुसार हे कामकाज चालते.

- मोहन खेवलकर, जिल्हा उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाॅईज असोसिएशन.