शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:23 IST

दाट धुक्यांचा परिणाम : अहमदाबादहून येणारे विमानही विलंबाने

जळगाव : दाट धुक्यांमुळे घावपट्टीवर विमान उतरवितांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे मुंबईकडून सायंकाळी जळगावला येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द करण्यात येत आहे. तर अहमदाबादहूनही सकाळी येणारे विमान एक तास विलंबाने येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे वारंवार विमानसेवा रद्द झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, आता गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अतिशय दाट धुके पडत असल्यामुळे याचाही विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरतांना पायलटला किमान ५ किलोमीटर अंतरावरुन धावपट्टी दिसणे आवश्यक आहे. मात्र, जळगाव विमानतळ परिसरात अतिशय दाट धुके असल्यामुळे पायलटला ही धावपट्टी अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अहमदाबादहून सकाळी १०. २५ मिनिटांनी येणारे विमान, सकाळी साडेअकराला येत आहे. तसेच मुंबईवरुन येतानांही सायंकाळी अतिशय दाट धुके असल्यामुळे जळगावला विमान न येता मुंबईहून अहमदाबादला रवाना होत आहे. दोन दिवसापासून हा प्रकार घडत आहे.अनेक प्रवाशांकडून तिकीट रद्दगेल्या दोन दिवसापासून दाट धुक्यामुळे मुंबईकडून येणारी विमान सेवा रद्द होत असल्यामुळे, अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले जात असल्याची माहिती विमान कंपनीच्या सुत्रांनी दिली. तसेच यामुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विमानाला दोन तासांपर्यंत विलंब होत आहे. मुंबईला गेल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जातांना विलंब होतो. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, मुंबईहून कोल्हापूरसाठी स्वतंत्र विमान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईहून जळगावला लवकर विमान येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाJalgaonजळगाव