आगीत २२ जनावरांसह गोठा खाक
By Admin | Updated: May 21, 2014 01:17 IST2014-05-21T01:17:54+5:302014-05-21T01:17:54+5:30
गोठ्यास आग लागून सहा म्हशी व १६ पारडू जागीच ठार झाले.

आगीत २२ जनावरांसह गोठा खाक
चोपडा : तालुक्यातील हातेड-बुधगाव रस्त्यावर असलेल्या एका गोठ्यास आग लागून सहा म्हशी व १६ पारडू जागीच ठार झाले. तर नऊ म्हशी व एक पारडू गंभीर आहे. ही घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या आगीत पशुमालकांचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. बुधगाव येथील दीपक साळुंके यांनी बाजूच्या गट नंबर १६५ मध्ये कोरड्या असलेल्या गव्हाच्या काड्या पेटविल्या. दुपारी हवेचा जोर असल्याने आग निंबा नामदेव साळुंखे यांच्या म्हशीच्या गोठ्यापर्यंत पोहचली. गोठा निंबा साळुंखे यांच्या मालकीचा होता. त्यात साळुंखे यांच्यासह मालती पाटील, अशोक पाटील, अमरीश पाटील, सुशील पाटील, मनोहर साळुंखे, किसन बाविस्कर यांच्या मालकीच्याही म्हशी व पारडू होते. े, असे हातेड मंडळाचे प्रभारी मंडळ अधिकारी आर.ए.वाडे यांनी सांगितले. आगीमुळे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.