शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:25 IST

धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.

ठळक मुद्दे  भूसंपादन प्रकरण  २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड

जळगाव :  धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.तापी पाटबंधारे महामंडळाने २००० मध्ये धरणाकरीता चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा व पातोंडा येथील २०५ शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. २००६ मध्ये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र मोबदला मिळत नसल्याने शेतक-यांनी २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. रक्कम कमी मिळत असल्याने शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेली. खंडपीठाने रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले.विधी सेवा प्राधिकरणाचे यशया रकमेच्या मोबदल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने पुढाकार घेऊन शेतकºयांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यासाठी १६० कोटी पेक्षा जास्त रक्कम देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला टप्पा एक तृतियांश रक्कम गुरुवारी शासनाने कोषागारात भरले. उर्वरित सर्व रक्कम वर्षभरात दोन टप्प्यात शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

भूसंपादन झालेल्या शेतक-यांनी दाखविलेला संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाºया यंत्रणांनी दाखविलेले सहकार्य यामुळेच लाभ देणे शक्य झाल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मनोगतात सांगितले. यशस्वी तडजोड व रक्कम जमा झाल्याबद्दल शेतकºयांनी न्या.सानप तसेच जिल्हा सेवा विधी प्राधीकरणाचे सचीव के.एच.ठोंबरे यांचा सत्कार केला. दरम्यान, मध्यस्थीने अशाप्रकारे २०५ शेतकºयांना भूसंपादन मोबदल्यापोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, पॅनल विधीज्ञ अ‍ॅड शिंदे, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, अ‍ॅड मंजू वाणी, सचिव अ‍ॅड. योगेश गावंडे, शतकºयांच्या वतीने  अ‍ॅड. एन.आर.लाठी, अ‍ॅड.आर.डी.झाल्टे, अ‍ॅड. मनोज पाचपोळ, यांनी काम पाहिले.तापी महामंडळातर्फे अ‍ॅड. देवप्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

बळीराजांनी केले शासनाला २५ कोटीचे व्याज माफसद्यस्थितीत दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना, दुसरीकडे मुंदखेडा व पातोंडा येथील शेतकºयांनी १६० कोटींच्या रक्कमेवरील १५ टक्कयांप्रमाणे व्याजाचे २५कोटी माफ करुन आदर्श उभा केला आहे. त्यामुळे शासनाचे २५ कोटी रुपये वाचणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव