शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:25 IST

धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.

ठळक मुद्दे  भूसंपादन प्रकरण  २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड

जळगाव :  धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.तापी पाटबंधारे महामंडळाने २००० मध्ये धरणाकरीता चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा व पातोंडा येथील २०५ शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. २००६ मध्ये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र मोबदला मिळत नसल्याने शेतक-यांनी २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. रक्कम कमी मिळत असल्याने शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेली. खंडपीठाने रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले.विधी सेवा प्राधिकरणाचे यशया रकमेच्या मोबदल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने पुढाकार घेऊन शेतकºयांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यासाठी १६० कोटी पेक्षा जास्त रक्कम देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला टप्पा एक तृतियांश रक्कम गुरुवारी शासनाने कोषागारात भरले. उर्वरित सर्व रक्कम वर्षभरात दोन टप्प्यात शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

भूसंपादन झालेल्या शेतक-यांनी दाखविलेला संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाºया यंत्रणांनी दाखविलेले सहकार्य यामुळेच लाभ देणे शक्य झाल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मनोगतात सांगितले. यशस्वी तडजोड व रक्कम जमा झाल्याबद्दल शेतकºयांनी न्या.सानप तसेच जिल्हा सेवा विधी प्राधीकरणाचे सचीव के.एच.ठोंबरे यांचा सत्कार केला. दरम्यान, मध्यस्थीने अशाप्रकारे २०५ शेतकºयांना भूसंपादन मोबदल्यापोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, पॅनल विधीज्ञ अ‍ॅड शिंदे, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, अ‍ॅड मंजू वाणी, सचिव अ‍ॅड. योगेश गावंडे, शतकºयांच्या वतीने  अ‍ॅड. एन.आर.लाठी, अ‍ॅड.आर.डी.झाल्टे, अ‍ॅड. मनोज पाचपोळ, यांनी काम पाहिले.तापी महामंडळातर्फे अ‍ॅड. देवप्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

बळीराजांनी केले शासनाला २५ कोटीचे व्याज माफसद्यस्थितीत दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना, दुसरीकडे मुंदखेडा व पातोंडा येथील शेतकºयांनी १६० कोटींच्या रक्कमेवरील १५ टक्कयांप्रमाणे व्याजाचे २५कोटी माफ करुन आदर्श उभा केला आहे. त्यामुळे शासनाचे २५ कोटी रुपये वाचणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव