शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:25 IST

धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.

ठळक मुद्दे  भूसंपादन प्रकरण  २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड

जळगाव :  धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.तापी पाटबंधारे महामंडळाने २००० मध्ये धरणाकरीता चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा व पातोंडा येथील २०५ शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. २००६ मध्ये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र मोबदला मिळत नसल्याने शेतक-यांनी २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. रक्कम कमी मिळत असल्याने शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेली. खंडपीठाने रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले.विधी सेवा प्राधिकरणाचे यशया रकमेच्या मोबदल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने पुढाकार घेऊन शेतकºयांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यासाठी १६० कोटी पेक्षा जास्त रक्कम देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला टप्पा एक तृतियांश रक्कम गुरुवारी शासनाने कोषागारात भरले. उर्वरित सर्व रक्कम वर्षभरात दोन टप्प्यात शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

भूसंपादन झालेल्या शेतक-यांनी दाखविलेला संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाºया यंत्रणांनी दाखविलेले सहकार्य यामुळेच लाभ देणे शक्य झाल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मनोगतात सांगितले. यशस्वी तडजोड व रक्कम जमा झाल्याबद्दल शेतकºयांनी न्या.सानप तसेच जिल्हा सेवा विधी प्राधीकरणाचे सचीव के.एच.ठोंबरे यांचा सत्कार केला. दरम्यान, मध्यस्थीने अशाप्रकारे २०५ शेतकºयांना भूसंपादन मोबदल्यापोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, पॅनल विधीज्ञ अ‍ॅड शिंदे, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, अ‍ॅड मंजू वाणी, सचिव अ‍ॅड. योगेश गावंडे, शतकºयांच्या वतीने  अ‍ॅड. एन.आर.लाठी, अ‍ॅड.आर.डी.झाल्टे, अ‍ॅड. मनोज पाचपोळ, यांनी काम पाहिले.तापी महामंडळातर्फे अ‍ॅड. देवप्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

बळीराजांनी केले शासनाला २५ कोटीचे व्याज माफसद्यस्थितीत दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना, दुसरीकडे मुंदखेडा व पातोंडा येथील शेतकºयांनी १६० कोटींच्या रक्कमेवरील १५ टक्कयांप्रमाणे व्याजाचे २५कोटी माफ करुन आदर्श उभा केला आहे. त्यामुळे शासनाचे २५ कोटी रुपये वाचणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव