पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By Admin | Updated: October 2, 2015 01:06 IST2015-10-02T01:06:14+5:302015-10-02T01:06:14+5:30

नंदुरबार :प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

Farmers on the road to the water | पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

नंदुरबार : तापी खोरे विकास महामंडळ निर्मित प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

मार्केट कमिटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. महिला-पुरुषांसह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. नंदुरबार व शहादा तालुक्यातील गावांना उपसा सिंचनाद्वारे पाणी आणून नद्या-नाले, तलाव व साठवण बंधारे भरून तापीच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.

मोर्चात शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व या वेळी नव्हते. सहभागी शेतकरी विशेषत: वयोवृद्ध व तरुणांनी हातात फलक घेऊन विविध घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना निवेदन देण्यासाठी पाच शेतक:यांचे शिष्टमंडळ गेले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर शेतक:यांच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या मध्यभागी तापी नदीवर प्रकाशा येथे बॅरेज बांधण्यात आला आहे. त्यात पाच ते सात वर्षापासून पाणी अडविण्यात आलेले आहे. तापी नदीची भौगोलिक परिस्थिती पाहता तापी नदीचे पात्र खोल आहे. त्यामुळे तापीच्या पात्रातून कालवे काढून ते पाणी शेतशिवारात फिरवणे शक्य नाही. त्याला पर्याय हा उपसा सिंचन योजना अर्थात लिफ्ट इरिगेशन हाच आहे. बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेताच्या बांधार्पयत आणण्याकरिता सदर उपसा योजना ही गुजरात पॅटर्नप्रमाणे 24 तास एक्स्प्रेस फीडर जोडून राबविण्यात यावी. जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनाद्वारे जिल्ह्यातील शेतजमिनीला पाणी मिळाल्यास शेतक:यांच्या दृष्टीने ते लाभदायकच ठरणार आहे. शिवाय शेतमजुरांनादेखील कायमस्वरूपी स्थानिक स्तरावरच रोजगार मिळणार असल्याने स्थलांतराचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. जोर्पयत लेखी स्वरूपात शासनाकडून हमी मिळत नाही तोर्पयत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देणा:यांच्या शिष्टमंडळात डॉ.रमेश पाटील, डॉ.वसंत पाटील, सुदामभाई चौधरी, हिरालाल चौधरी, रवींद्र पाटील आदी सहभागी झाले होते.

रणरणते ऊन लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संयोजकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टँकर व फायर फायटर पाठविले होते.

शहर पोलिसांतर्फे मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title: Farmers on the road to the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.