शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:43 IST

अवकाळी पावसामुळे बाधित पीक पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ.सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार दीना नाथ यांचे पथक दोन दिवस जिल्हा दौºयावर आले होते.

ठळक मुद्दे केंद्रीय पथकाकडून पिकांच्या नुकसानीची पाहणीपीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल

जळगाव : अवकाळी पावसामुळे बाधित पीक पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ.सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार दीना नाथ यांचे पथक दोन दिवस जिल्हा दौºयावर आले होते. त्यांनी शनिवारी सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली, पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे, भडगाव तालुक्यातील भोरटेक तर चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकºयांनी या पथकासमोर आपल्या व्यथा मांडल्या.या पथकासमवेत नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आदी अधिकारी उपस्थित होते.पथकाने खेडगाव नंदीचे, ता.पाचोरा येथील शेतकरी कांताबाई तेजमल संघवी यांच्या नुकसान झालेल्या मका पिकाची, भोरटेक, ता.भडगाव येथील शेतकरी हिंमतराव त्र्यंबकराव शितोळे यांच्या तूर व ज्वारी पिकाची, तर हिंगोणे खुर्द, ता.चाळीसगाव येथील शेतकरी अरविंद भीमराव पाटील यांच्या शेतातील ज्वारी पिकाची पाहणी केली.यावेळी डॉ. सुभाष चंद्र यांनी सांगितले, की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच त्यांनी पाहणी केलेल्या शेतकºयांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाºयांना माहिती देताना शेतकºयांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. कपाशीच्या आतापर्यंत तीनवेळा वेचणी झाली असती, परंतु पावसामुळे वेचणीतर नाहीच पण उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची विनंती केली.तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. पिकांचे जिल्ह्यातील सहा लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे सात लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या भरपाईसाठी सन २०१९-२० मध्ये ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता आहे. शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. अद्याप ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव