शहरं
Join us  
Trending Stories
1
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
2
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
3
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
6
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
7
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
8
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
9
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
10
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
11
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
12
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
13
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
14
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
15
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
16
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
17
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
18
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
19
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का? अन् शेवटी त्यांच्या पदरी पडणार केवळ ६,९५० रुपये !

By अजय पाटील | Updated: June 2, 2025 11:30 IST

पाहा, गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात वाढ करून तो ८ हजार ११० प्रति क्विंटल केला आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव पाहता, वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

गेल्या हंगामात शासनाकडून ७ हजार ५०० रुपयांचा हमीभाव असताना, सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, तर खासगी जिनिंगमध्ये ६,५०० ते ६,८०० रुपये क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागला. त्यात सीसीआयच्या केंद्रावर अनेक अटी-शर्थींमुळेही शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.

गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

  • २०२०-२१    ५,८२५ 
  • २०२१-२२    ५,७२६ 
  • २०२२-२३    ६, ३८० 
  • २०२३-२४    ७,०२० 
  • २०२४-२५    ७,५२१ 
  • २०२५-२६    ८,११०

असे आहे गणित

  • एकरी खर्च- ३३,६००  
  • एकरी कापूस उतारा- ५ क्विंटल 
  • यंदाचा हमीभाव- ८,११० रुपये क्विंटल 
  • हमीभावाप्रमाणे भाव मिळाल्यास ४०,५५० रुपये 
  • लागवड खर्च काढून होणारा फायदा ६,९५० हजार

शेतमाल किमती घसरण्याचा धोका

रूपेश उत्तरवार, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्केने कमी केले. यामुळे खुल्या बाजारात तेलबियाण्याच्या शेतमालाच्या किमती घसरण्याचा धोका आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्था मोडणार आहे. खर्चावर आधारित दर शेतमालाला मिळणार नाही. सोयाबीनचे लागवड क्षेत्र यामुळे घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आहे. याचवेळी केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १६.५० टक्के केले आहे. पूर्वी कच्च्या तेलावरील खाद्य शुल्क २६.५० टक्के होते. यामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे पामतेलाच्या किमती ९ रुपये प्रतिकिलोने कमी झाल्या आहेत. तर सोयाबीन तेलाच्या किमती १० रुपये प्रतिकिलोने घसरल्या आहे. तर सूर्यफूल तेलाच्या किमती किलोमागे ११. ५० पैशाने कमी झाल्या आहेत. यामुळे पुढील काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने शेतमाल खरेदी करताना साेयाबीन प्लॉन्टचे दर क्विंटलमागे १०० रुपयाने कमी झाले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव