शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का? अन् शेवटी त्यांच्या पदरी पडणार केवळ ६,९५० रुपये !

By अजय पाटील | Updated: June 2, 2025 11:30 IST

पाहा, गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात वाढ करून तो ८ हजार ११० प्रति क्विंटल केला आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव पाहता, वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

गेल्या हंगामात शासनाकडून ७ हजार ५०० रुपयांचा हमीभाव असताना, सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, तर खासगी जिनिंगमध्ये ६,५०० ते ६,८०० रुपये क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागला. त्यात सीसीआयच्या केंद्रावर अनेक अटी-शर्थींमुळेही शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.

गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

  • २०२०-२१    ५,८२५ 
  • २०२१-२२    ५,७२६ 
  • २०२२-२३    ६, ३८० 
  • २०२३-२४    ७,०२० 
  • २०२४-२५    ७,५२१ 
  • २०२५-२६    ८,११०

असे आहे गणित

  • एकरी खर्च- ३३,६००  
  • एकरी कापूस उतारा- ५ क्विंटल 
  • यंदाचा हमीभाव- ८,११० रुपये क्विंटल 
  • हमीभावाप्रमाणे भाव मिळाल्यास ४०,५५० रुपये 
  • लागवड खर्च काढून होणारा फायदा ६,९५० हजार

शेतमाल किमती घसरण्याचा धोका

रूपेश उत्तरवार, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्केने कमी केले. यामुळे खुल्या बाजारात तेलबियाण्याच्या शेतमालाच्या किमती घसरण्याचा धोका आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्था मोडणार आहे. खर्चावर आधारित दर शेतमालाला मिळणार नाही. सोयाबीनचे लागवड क्षेत्र यामुळे घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आहे. याचवेळी केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १६.५० टक्के केले आहे. पूर्वी कच्च्या तेलावरील खाद्य शुल्क २६.५० टक्के होते. यामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे पामतेलाच्या किमती ९ रुपये प्रतिकिलोने कमी झाल्या आहेत. तर सोयाबीन तेलाच्या किमती १० रुपये प्रतिकिलोने घसरल्या आहे. तर सूर्यफूल तेलाच्या किमती किलोमागे ११. ५० पैशाने कमी झाल्या आहेत. यामुळे पुढील काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने शेतमाल खरेदी करताना साेयाबीन प्लॉन्टचे दर क्विंटलमागे १०० रुपयाने कमी झाले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव