शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

जळगावात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 08:49 IST

९९ नोंदणीकृत सावकारांनी दिलेय दीड कोटींचे कर्ज: ५ अवैध सावकारांवर झालीय कारवाई

- सुशील देवकर

जळगाव : शासनाकडून जिल्ह्णात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतक-यांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत ९९ सावकारांनी या वर्षी ९३० शेतक-यांना १ कोटी ४३ लाखांचे कर्ज दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र अवैध सावकारांकडील आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे.

शेतक-यांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. सावकार नोंदणीकृत असेल तर शासनाने ठरवून दिलेल्या दराने व्याज आकारणी करतो. मात्र बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणा-यांकडून रक्कमेची उचल करतात. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. जिल्ह्णात नोंदणीकृत सावकारांसोबतच अवैध सावकारांकडेही मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना नाईलाजाने जावे लागत आहे. सहकार विभागाने टाकल्या ९ धाडी जिल्ह्यात अवैध सावकारी जोरात सुरू असल्यानेच शेतक-यांच्या परिस्थितीचा, गरजेचा गैरफायदा घेण्याचे, त्यांना लुबाडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

मात्र पुन्हा त्याच सावकाराकडे हात पसरावे लागणार असल्याचे माहिती असल्याने शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाही. तरीही वर्षभरात सहकार विभागाने जिल्ह्णातील अवैध सावकारांवर ९ धाडी टाकून त्यापैकी २ प्रकरणी ५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सावकारांनी शेतक-यांकडून हडप केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याच्या संदर्भात एकूण ६ प्रकरणात कलम १८ अन्वये सहकार विभागाकडे सुनावणी सुरू आहे. उघडकीस आलेली प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चार वर्षात सावकारांची संख्या कायमअवैध सावकारांकडून शेतक-यांची लुबाडणूक होत असल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी सावकारांना परवाने देण्याची पद्धत सुरू केली आहे. या नोंदणीकृत सावकारांना शासनच कृषी कर्ज व बिगर कृषी कर्ज, तारणी कर्ज व बिगर तारणी कर्ज असे चार प्रकारांसाठी व्याजदर ठरवून देत असते. या नोंदणीकृत सावकारांची संख्या गेल्या चार वर्षांपासून कायम आहे. २०१५-१६ मध्ये ९८ नोंदणीकृत सावकार होते. २०१६-१७ मध्ये ही संख्या ८९ झाली. २०१७-१८ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये नोंदणीकृत सावकारांची संख्या ९९ झाली आहे.

९३० शेतकऱ्यांना दिले कर्जजिल्ह्णात यंदा ९९ सावकारांनी नोंदणी केली असून त्यांनी आतापर्यंत ७८० शेतक-यांना (व्यक्तींना) सोने, जमीन तारणावर १ कोटी १२ लाख २२ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर १५० शेतक-यांना ३१ लाख ८ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. बँकांनी हात वर केल्याने शेतक-यांना नाईलाजाने सावकाराची पायरी चढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी