शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

संरक्षित केळी पीक विम्याच्या रकमेअभावी शेतकरी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

जून २०२० मध्ये वादळी पावसातील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या केळी नुकसानीचा हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १,८७१ शेतकऱ्यांच्या ...

जून २०२० मध्ये वादळी पावसातील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या केळी नुकसानीचा हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १,८७१ शेतकऱ्यांच्या संरक्षित विम्याची ८.७१ कोटी रुपयांची रक्कम तब्बल नऊ महिन्यांच्या विलंबानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने बँकेत वर्ग केली आहे. विमा कंपनीने तब्बल नऊ महिन्यांचा विलंब केल्याची बाब प्रथमदर्शनी दिसत असली तरी, तालुक्यातील काही बँक शाखा व्यवस्थापनाने वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र, संबंधित विमा हप्त्याची रक्कम व देय संरक्षित विम्याच्या रकमा अशी अत्यावश्यक माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर भरताना महसूल भाग मंडळाचे क्षेत्र चुकीचे भरल्याने, कुणाचा हप्त्याची रक्कम वा बाधित क्षेत्र चुकीची भरल्याने तथा शेतकऱ्यांच्या आधारकार्डाचे विवरण चुकीचे भरले. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचे संरक्षित विम्याच्या देय रकमेची माहिती भरकटल्याने शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला होता.

तत्संबंधीची बाब जिल्हा कृषी विभागाने ध्यानात आणल्याने विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल मंडळ, नुकसानग्रस्त क्षेत्र, विमा हप्ता आदी विवरण चुकीचे भरणाऱ्या संबंधित बँक व्यवस्थापनाने ५ कोटी रुपयांचा दंड संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केला आहे.

दरम्यान, काही केळी उत्पादक शेतकऱ्यांचे विमा हप्ते बँक व्यवस्थापनाने कपात केले असले तरी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे संबंधित विमा कंपनीकडे सादर झाले नसल्याचा घोळ उघड झाला आहे. परिणामी संबंधित शेतकरी संरक्षित विम्याच्या रकमेपासून वंचित आहे. आधारकार्डाचे विवरणाच्या चुकीसंदर्भात दोष स्वीकारण्याबाबत विमा कंपनी व बँक व्यवस्थापन परस्परविरोधी अंगुलीनिर्देश करीत असले तरी शेतकऱ्यांच्या संरक्षित विम्याची रक्कम विनाविलंब अदा करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

नुकसानीचा पंचनामा संयुक्त करावा

वेगवान वाऱ्यांमुळे होणाऱ्या केळी नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी विमा कंपन्या खादगी प्रणालीतून पंचनामे करीत असल्याने मोठा घोळ निर्माण होत असल्याची गंभीर बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शासनाची महसूल व कृषी विभागाची संयुक्त प्रणालीद्वारे होत असलेल्या पंचनामे व विमा कंपनीच्या पंचनाम्यांमध्ये विसंगती होत असल्याने शासनाने विमा कंपन्यांना शासकीय पंचनामे बंधनकारक करावेत. अन्यथा शासनप्रणालीच्या समक्षच विमा कंपनीने पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. परिणामी शेतात केळीचे खोड लावले नसताना केवळ बँकांनी कर्ज वितरणात केळी नसतानाही केळी फळपीक विम्याचा हप्ता कपात केला म्हणजे, शेतात केळीबागा अस्तित्वात नसताना संरक्षित विम्याच्या लाखो रुपयांच्या रकमा जमा होण्याचा सावळा गोंधळ थांबेल, असे स्पष्ट मत काही काळ्या मातीशी इमान राखून असलेल्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

हवामानावर आधारित केळी फळपीक विमा योजनेतील वेगवान वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचा संरक्षित विमा अदा करण्यासाठी विमा कंपनीच्या पोर्टलवर चुकीची माहिती सादर झाल्याने तथा चुकीचे महसूल मंडळ निर्देशित केल्याने व आधारकार्डाचे विवरण चुकीचे सादर केल्याने तालुक्यातील ४० ते ५० शेतकरी लाभापासून वंचित आहेत. बँक व्यवस्थापनाच्या या चुकीमुळे तब्बल पाच कोटी रुपये दंडाची रक्कम बँकांनी अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने पारित केले आहेत. आधारकार्ड विवरणातील त्रुटींची जबाबदारी स्वीकारण्याबाबत बँक व्यवस्थापन व विमा कंपनी परस्परविरोधी दोष दर्शवत असले तरी लवकरच निपटारा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- एम. जी. भामरे, तालुका कृषी अधिकारी, रावेर