कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

By Admin | Updated: May 7, 2014 01:46 IST2014-05-07T01:46:13+5:302014-05-07T01:46:13+5:30

तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.

Farmers anger against farmers: Gathering for help ... | कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

धरणगाव : तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. या सर्व वंचित शेतकर्‍यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी कार्यालयावर धडक देऊन कृषी अधिकार्‍यांना घेराव घातला व संतप्त भावना व्यक्त करीत पुरवणी यादी तयार करण्याची मागणी केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोन दिवस तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. शेकडो हेक्टरातील पिके जमीनदोस्त झाली. गहू, हरभरा, मका, कापूस आदी पिके भुईसपाट झाली. यानंतर शेतकर्‍यांच्या मागणीवरून नुकसानीचे पंचनामे झाले. शेकडो हेक्टरात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी शासनाकडे सादर केला होता. झालेल्या पंचनाम्यानंतर शासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत अनेकांची नावे नसल्याचे नंतर उघडकीस आल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला होता. आता मदतीच्या याद्या प्राप्त होऊ लागल्याने कृषी व महसूल विभागाने केलेली गडबड समोर येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी धारेवर या वेळी पी.सी. पाटील यांनी या विषयावरून कृषी कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले व जर तुम्ही न्याय देणार नसाल तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला. या वेळी तहसीलदारांकडे पुरवणी यादी पाठविण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिले. धरणगाव तालुक्यातील ५२ गावांमध्ये गारपीट झाल्याने कृषी विभागातर्फे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार पंचनामे झाल्याने शेतकर्‍यांना मदत मिळत आहे. मात्र पंचनामा करताना कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी काही शेतकर्‍यांना डावलल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांवर अन्याय हा आकडा तीन ते चार हजार शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे पी.सी. पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांना शेतकर्‍यांसमवेत घेराव घालून व्यथा मांडल्या. नुकसानीची सविस्तर माहिती त्यांना सुपूर्द केली व वंचित शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली. या वेळी वंजारी, पष्टाणे, भवरखेडा, शामखेडा व इतर गावांचे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Farmers anger against farmers: Gathering for help ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.