शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पिलखेडा येथील शेतकऱ्याने केळीला शोधला पेरुचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:08 IST

ग्रामीण भागात नव्या प्रयोगाची नवलाई : जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी केली फळबागेची पाहणी, रोज येतात किमान १० ते १२ शेतकरी भेटीला

चुडामण बोरसेजळगाव : केळीवर वारंवार येणारी संकटे आणि नुकसान यावर पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी केळीला पेरुचा पर्याय शोधला आहे. किमान किलोभर वजनाचा एक पेरु या फळबागेत येत आहे. हे पेरु आता मुंबईच नाही तर दिल्ली आणि गुजरातच्या बाजारपेठतही पाठविले जात आहेत.जळगावपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिलखेडा येथील किशोर चौधरी आणि त्यांच्या बंधूची ४० एकर शेती आहे. यापैकी १० एकरावर ते फळबाग लावतात तर २० एकरावर केळी लावायचे.किशोर यांच्या दहावीपर्यंत शिक्षण झाले. दहावीत असताना शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. शेतीमध्ये वेगळे काही प्रयोग करण्याचे विचार तेव्हापासून सुरू झाले. काही वर्षापूर्वी कृषी प्रदर्शनात त्यांनी भला मोठा एक डाळिंब पाहिला होता. याप्रमाणेच आपणही काही प्रयोग करावा असा विचार त्यांच्या मनात आला. पण एक-दीड वर्ष काहीच सूचले नाही. शेवटी चार वर्षांपूर्वी फळबाग योजनेचा विचार मनात आला आणि त्याला लागलीच मूर्त स्वरूप दिले. बाग तयार केली आणि पेरूची लागवड सुरू झाली. ही फळबाग सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात आली. आठ एकरात त्यांनी ४६०० पेरू रोपांची लागवड केली आहे. रायपूर (छत्तीसगड) येथून ही रोपे आणण्यात आली. पेरू पिकांना कव्हरींग, फवारणी यासाठी प्रचंड खर्च आला. त्याची तमा न बाळगता त्यांनी या रोपांचे संगोपन केले. यातून मग चांगली फळे आकाराला आली. एक पेरू ८०० ते १००० ग्रॅम वजनाचा आहे.परंपरागत फळ लागवड ही खड्डे खोदून केली जाते. परंतु चौधरी यांनी गादी वाफे तयार करून, त्यात खड्डे करून पेरूची लागवड केली आहे. लागवड करताना ठिंबक सिंचन बसविण्यात आले. यातून या रोपांना मोठ्या प्रमाणात फळ धारणा झाली असून हे पेरू आता मुंबईसोबतच गुजरात आणि दिल्लीच्या बाजारपेठेतही जात आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी या फळबागेची पाहणी केली.शेतकऱ्यांनी नव- नवीन प्रयोग करायाल हवेत. आमच्याकडील पेरुला अ‍ॅपल टेस्ट आहे, आणि यापुढे त्यातही नवीन काही करुन पेरु परदेशी पाठविण्याचा मानस आहे.-किशोर चौधरी, शेतकरी, पिलखेडा ता. जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव