शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

पटले कुटुंबाची किमया, ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 10:00 IST

डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे.

ठळक मुद्देडोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली.अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे.उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.

वसंत मराठे

तळोदा : डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.

सातपुड्यातील कुंभरी हे ३०० लोकवस्ती असलेल छोटसं गाव. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे शासनाकडून मिळालेल्या वनपट्ट्यावर ग्रामस्थांचा उदरनिर्वाह करावा लागतो. गावातील १०० जणांना शासनाकडून सामूहिक वनपट्टे देण्यात आले आहेत. डोंगरावरील मिळालेल्या सामूहिक वनपट्ट्यात लावण्यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते साधारण दीड ते दोन हजार आंबा, पेरू, सिताफळ, बोर, महू, साग अशी रोपे मिळाली होती. ही सगळी रोपे राजा बोरखा पटले, सोमा बोरखा पटले या बंधूंनीदेखील आपल्याला मिळालेल्या वनपट्ट्यात लावली. तथापि, ही रोपे जगविण्यासाठी त्यांच्यापुढे पाण्याचा यक्ष प्रश्न होता. कारण मिळालेला वनपट्टादेखील उंच टेकडीवरच आहे. त्यामुळे साहजिकच पाणी पोहचणे अशक्य होते. मात्र त्यांच्यातील मेहनत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यांच्या शेतापासून एक हजार ७०० फूट लांब उंचीवरील नैसर्गिक झऱ्याचे पाणी आणण्याची युक्ती लढविली. या झऱ्याच्या ठिकाणी मोठी विहीर खोदून तेथून तेवढ्याच लांबीची नळी टाकून या नळीद्वारे दररोज झाडांना पाणी घालत आहेत. जवळपास दीड वर्षांची ही फळबाग झाली आहे. आंबे २५०, पेरू २३०, बोर २५०, सिताफळ २५० या फळ पिकांबरोबरच महू १५०, साग १०० व साग २५० अशी साधारण दीड-दोन हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे ओसाड रानावर हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया या पटले बंधूंनी केली आहे. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून आपल्या वनपट्ट्यात मेथी, टमाटर, वांगे, मिरची व वालपापडी या सारखी भाजी पाल्याची आंतरपिकेदेखील ते घेत आहेत. त्याच्या विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. सातपुड्यातील झऱ्याच्या पाणी व्यवस्थापनासाठी त्यांना साधारण २५ हजार रुपये खर्च आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. या पैशातून २० फुटाचे ९० पाईप लागल्याचे ते म्हणाले. छोट्याशा पाण्याच्या स्त्रोतात एकही थेंब वाया न जावू देता प्रत्येक झाडाला आपल्या अथक प्रयत्नातून पाणी पुरवित असल्याचेही सेगा पटले सांगतात.

पर्यावरण बचावाच्या नावाखाली वर्षानुवर्षे दऱ्याखोऱ्यात, जंगलात राबणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा दर्जा नाकारला जात असताना पटले बंधूंनी आपल्या कौशल्यातून ओसाड, खडकाळ टेकडीवर फळबाग लावून हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया साधली आहे. एकीकडे वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी वनविभाग करोडो रुपये खर्च करूनही सातपुडा अजून हरित झाला नसल्याचे चित्र आहे. मात्र कुंभरीकरांनी कमी खर्चात आपला परिसर हरित करून दाखविला. त्यामुळे या गावकºयांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

शासनाकडून मिळालेल्या अडीच हेक्टर वनपट्ट्यात पारंपरिक शेती न करता फळबाग घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी लोकसमन्वय प्रतिष्ठानकडून आंबे, पेरू, सिताफळ, बोर अशी रोपे मिळाली होती. या रोपांबरोबरच साग, महू रोपेही लावलीत. परंतु पाण्याचाही प्रश्न होता. परंतु शेतापासून लांब असलेल्या नैसर्गिक झऱ्याचा विचार आला. तेथे लहान विहीर खोदली. या विहिरीतून साधारण एक हजार ७०० फुट लहान लाईप टाकून फळबागेस पाणी देत आहोत. या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून भाजीपालादेखील घेत आहोत. पाण्याच्या या व्यवस्थापनेतून फळबागही फुलली आहे.

- सेगा राज्या पटले, शेतकरी, कुंभरी, ता.धडगाव

टॅग्स :Jalgaonजळगावagricultureशेती