शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नाटक सादर करताना अडीअडचणींवर मात करण्याची उर्मी स्पर्धेतून मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:08 PM

सूर : परिवर्तन संस्थेच्यावतीने ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’वर परिसंवाद

ठळक मुद्देसगळ्या कलांना सोबत घ्यावेचांगला विचार देणारे नाटक सादर व्हायला हवे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - नाटक सादर करताना तालीमसाठी जागा नसणे, साधन नसणे, योग्य वातावरण नसणे, संहीता नसणे तसेच पैशाची जुळवाजुळव करावी लागते, अशा  अनेक अडचणी दिग्दर्शक, कलावंतांसमोर असतात. या सर्वामध्ये नाटक सादर करायची उमेद व उर्मी मात्र असते. त्यामुळेच सर्व अडीअडचणींवर मात करीतही नाटकाचे सादरीकरण करणे, नाटक होणे हेच अधिक महत्त्वाचे असून या अडचणींनी सोडवणूक प्रत्येक कलावंत कशी करतो व आधुनिक काळातही उर्मी मिळवितो, असा सूर  मंगळवारी परिवर्तन संस्थेच्यावतीने आयोजित ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’ या परिसंवादामधून उमटला. नाटय़कलावंत राज्य नाटय़ स्पर्धा झाल्यानंतर एरव्ही इकडे तिकडे निघून जातात. मात्र मंगळवारी परिवर्तन संस्थेच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर आणले.  परीवर्तन संस्था यंदा राज्य नाटय़ स्पर्धेत सहभागी नसल्याने त्यांनी रंगकर्मीनी आपल्या भावना, मत व्यक्त करावे यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये स्पर्धा संपली की नाटक संपते. नाटकाचे प्रयोग होत नाही, नाटकवाल्यांमध्ये त्याबद्दलची देवाणघेवाण होत नाही, दिग्दर्शकांशी अनेकदा कलावंतांचाही संवाद होत नाही. यामुळे नाटकाचे मूल्यमापन करायला अनेकदा कमी पडतो. त्यामुळे  शहरातील नाटक हे एका विशिष्ट मर्यादेपुरताच अडकते आणि ते पुढे जात नाही. यावर विचार व्हावा या उद्देशानेच हा परिसंवाद घेण्यात आल्याचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंजुषा भिडे, प्रा.डॉ. शमा सुबोध, पियूष रावळ, चिंतामण पाटील, विनोद ढगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांसह स्पर्धेतील प्रत्येक दिग्दर्शकाचा स्मृतीचिन्ह व ‘लोकमत’चा दीपोत्सव अंक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश भोळे, अनिल कोष्टी, विशाल जाधव, किरण अडकमोल, प्रदीप भोई, आकाश बाविस्कर, चिंतामण पाटील यांचा समावेश होता. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. 

नाटकाचे विविध प्रकार, आधुनिक काळात बदलेले नाटक, रंगमंचाचा शक्यतांचा घेतलेला शोध व यातुन नविन करण्याची मिळालेली उर्मी या सर्वांचा उहापोह यामध्ये प्रत्येक कलावंतांनी केला. प्रत्येक नाटकांविषयी दिग्दर्शक, वक्ते व उपस्थित कलावंतांनी मते मांडली. 

सगळ्या कलांना सोबत घ्यावेयावेळी चिंतामण पाटील म्हणाले की नाटकात काय करावे? आणि काय करु नये हे आम्हाला नाटक पाहून कळाले.  अनेकदा संगीताची जोड नाटकाला देणे खूप कठीण असते. मात्र नाटय़कर्मीनी सगळ्यांची साथ, सगळ्या कलांना सोबत घ्यावे. नृत्य, संगीत, शिल्प अशा सगळ्या कलांमध्ये गेल्यास नाटक व कलावंत म्हणून आपण अधिक प्रगल्भ होत असतो असे नमूद केले.  मिलींद पाटील यांनी प्रेक्षकांच्या भूमिकेतून मत मांडताना सांगितले की समाजाला आपण काय देतो? यातून लेखन व्हावे. सकारात्मकतेच्या बाबींचा विचार करून त्यापद्धतीने प्रेक्षकांना चांगला विचार देणारे नाटक सादर व्हायला हवे. तर प्रविण पांडे यांनी राज्य नाटय़ाला आपण काय द्यायला हवे याचाही विचार हवा. कलावंत म्हणून नाटय़ स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी आपण काय करतो आहे याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.