शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी तडजोड रक्कम भरण्यास पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:36 IST

कर्जमाफीच्या घोळाचा विक्रम : अमंलबजावणी सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना २०१७ च्या अंमलबजावणीतील घोळ दोन वर्षांपासून सुरूच आहे. आता या योजनेंतर्गत तडजोडीची (ओटीएस) रक्कम भरण्यासाठीची मुदत ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.सतत चार वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडून थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्जही मिळणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली.कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान व ओटीएस अशा तीन वर्गवारीत ही कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले. त्यांची ९६६ कोटी ४० लाख ६१ हजार ९९९ रूपये इतकी रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली. मात्र या प्रक्रियेत आतापर्यंत २ लाख २७६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७७९ कोटी ६७ लाख ४३ हजार ३३२ रूपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अद्यापही ४३ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची १८६ कोटी ७३ लाख १८हजार ६६७ रूपये एवढी रक्कम वर्ग होणे बाकी आहे.आता सरसकट शेतकरी कर्जमाफीचा घोळशेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली बदलत्या अटींमुळे घोळ घातला गेला. तो अजूनही मिटलेला नाही. आता सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची तयारी शासनाने चालविली असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. आधीची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. तर अनेकांना कर्जमाफी मिळूनही थकबाकीदार राहिल्याने त्यांना पिककर्जही मिळू शकलेले नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ३० जून २०१८ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.विधानसभा निवडणुकांना जेमतेम अडीच महिन्यांचा कालावधी उरला असतानाही या कर्जमाफी योजनेचा घोळ सुरूच आहे. दिवसेंदिवस त्यात नवीन निर्णयाची भर पडत आहे.३१ आॅक्टोबरपर्यंत संधीकर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकºयांना त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्यास मुदत वेळोवेळी वाढवत ३० जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकरी बाकी असल्याने या शेतकºयांना लाभ मिळावा यासाठी ओटीएस योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत १ जुलै ते ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव