शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर पानमांजरीचे अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 12:19 IST

खान्देशात पहिलीच नोंद, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना आढळला प्राणी

विजयकुमार सैतवाल

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर जलाशय परिसरात पानमांजर हा संकटग्रस्त प्राणी असल्याचे सिद्ध झाले असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय ‘इला जर्नल’ या आंतराष्ट्रीय पुस्तिकानेही घेतली आहे. खान्देशात प्रथमच हा प्राणी आढळून आला असून जळगाव जिल्ह्याच्या जैवविविधता समृद्धतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे अभ्यासक वर्षभर जिल्ह्यातील विविध पानवठ्यांचे निरीक्षण करून वनस्पती, वन्यजीव आणि पक्षांची नोंद घेत असतात. याच नोंदीमध्ये आता ‘आॅटर’ अर्थात पानमांजर या संकटग्रस्त वन्यजीवांची भर पडली आहे.हतनूर धरणाच्या बॅक वॉटर भागात १८ जानेवारी २०१९ रोजी पक्षी निरीक्षण करीत असताना वन्य जीव संरक्षण संस्थेचे राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. त्या वेळी त्यांनी बारीक निरीक्षण केले असता सदर प्राणी पानमांजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या भागात वेळोवेळी भेट देत सदर प्राण्यांच्या नोंदी घेत त्याचे निरीक्षण करून अभ्यास केला. या दरम्यान त्याचे छायाचित्रेदेखील घेतले.

ही माहिती वन्यजीवांविषयी काढण्यात येणाऱ्या ‘इला जर्नल’ या आंतरराष्ट्रीय पुस्तकासाठी पाठविण्यात आली. यावर पूर्ण माहिती घेत ‘इला जर्नल’ने ही माहिती प्रसिद्धी केली. या पूर्वी संस्थेचे वनस्पती, पक्षी, सर्प यावर शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. यात पानमांजर या प्राण्याची नोंद महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रातदेखील सदर प्राण्यांची नोंद वनरक्षक रहीम तडवी यांनी घेतली आहे.

पहिलीच नोंद

जळगाव जिल्ह्यात तसेच खान्देशात या प्राण्याचे अस्तित्व आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी संस्थेच्या अभ्यासकांनी विविध गॅझेटचा अभ्यास केला. मात्र त्यात कोठेही पानमांजराची नोंद आढळली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ही पहिलीच ‘फोटोग्राफीक’ नोंद असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

सदर नोंदीसाठी उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. संस्थेचे रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, वासुदेव वाढे, सतीश कांबळे, योगेश गालफडे, गौरव शिंदे, सुरेंद्र नारखेडे, वनरक्षक रहीम तडवी, डोलारखेडा ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.

संकटग्रस्त प्राणी

जगात कोणते वन्यजीव संकटात आहे, याची नोंद घेत दरवर्षी माहिती प्रसिद्ध करणाºया ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेषन आॅफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेने त्यांच्या यादीमध्ये पानमांजराची नोंद संकटग्रस्त प्राणी म्हणून नोंद केली आहे. प्रदूषण, पाणथळ जागा नष्ट होणे, शिकार, अनियंत्रित मासेमारी, भक्षाची कमतरता याकारणांमुळे ही प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात आली आहे. अशा स्थितीत हा संकटग्रस्त पाणी जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वास वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना वन विभागाच्यावतीने नेहमी सहकार्य केले जाते. त्यांच्या अभ्यासादरम्यान अनेक प्राणी, वनस्पती आढळून आल्या असून त्याची नोंद वनविभागाकडे आहे. आता पानमांजर प्राण्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

- दिगंबर पगार, उप वनसंरक्षकवेळोवेळच्या निरीक्षण आणि अभ्यासावरून आता पानमांजराचे आपल्या भागात अधिवास आहे हे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारचे अनेक दुर्मिळ संकटग्रस्त प्राणी, पक्षी, जलचर, जिल्ह्यात अधिवास करून आहेत हे आपले भूषण असून हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल.

- राहुल सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था

 

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव