शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कागदपत्रांच्या अदला बदलीने जिवंत महिलेला ठरविले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:52 IST

चुकीच्या संदर्भाने सर्वांनाच ताप

जळगाव : रुग्णसंख्या वाढणे व त्याचबरोबर नोंदणी, कागदपत्रे, अदलाबदली असे काहीसे प्रकार व यानंतरचा गोंधळ आता समोर येऊ लागला आहे़ भुसावळच्या मृतदेह अदलाबदली प्रकरणाला दिवस उलटत नाही तोच आणखी एक कागदपत्रांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला़ पोलिसांनी नातेवाईकांना कळविण्यासाठी वडलीत फोन केला व महिला जिवंत असल्याचा उलगडा झाला़ ह्यलोकमतह्ण मुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला़इकरा वैद्यकीय महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे़ या ठिकाणी आॅक्सिजनची व्यवस्था असल्याने मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना दाखल करण्यात येत असते़ मात्र, रुग्णांची प्रकृती खाल्यावल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात संदर्भीत केले जाते़ रुग्णवाहिकेत रुग्णाला पाठविले जाते व त्यासोबत त्यांचा संदर्भ पत्र, रुग्णाची सर्व माहिती असणारे कागदपत्र दिली जातात़इकराच्या कोविड हेल्थ सेंटरमधून शनिवारी पहाटे एका महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्या महिलेला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले़ कोविड रुग्णालयात येईपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता़ रुग्णवाहिका चालकाने महिला व महिलेची कागदपत्रे सोपविली व परतला़ महिला मृत असल्याचे समजल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणीच नव्हते, अखेरह्यब्रॉड डेडह्ण म्हणून त्यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांना कळविले़ दरम्यान, कागदपत्र चुकल्याचा घोळ समोर आला तेव्हा कोविड रुग्णालयात मात्र, गोंधळ उडाला हा मृतदेह नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला. तासाभरानेनंतर हा घोळ मिटला अन् साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.लोकमत प्रतिनिधीला फोनकागदपत्रांवरून औद्योगिक वसाहत येथील हवालदार शिवदास चौधरी यांनी वडलीत नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो न झाल्याने त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींना फोन करून महिलेच्या नातेवाईकांना कळवा व पाठवून द्या, असा निरोप दिला़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने तातडीने महिलेच्या नातेवाईकाला फोन लावला व मृत्यूचे सांगितले. मात्र, माझी आजी जिवंत आहे़ मी इकरा सेंटरलाच आहे़़़़़असे या मुलाने सांगितले व त्यानंतर जिवंत महिलेची कागदपत्र मृत महिलेसोबत गेल्याचा उलगडा झाला़ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कोविड रुग्णालयाला कळविले व त्यानंतर इकरा येथून परिचारिका आल्या व त्यांनी योग्य संदर्भ पत्र व कागदपत्रे दिली़ त्यानुसार संबधित मृत महिलेच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले.रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता़ पाऊसही होता़ यात नजरचुकीने झालेला हा प्रकार आहे़ कुणीही हेतुपुरस्कर केलेले नाही़-डॉ़ शांताराम ठाकूर, इकरा वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Jalgaonजळगाव