शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

सर्वांनाच हवी एलसीबीला बदली; स्थगितीवरही अनेकांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

सुनील पाटील जळगाव : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठविल्याने पोलीस दलातही आता बदल्यांचे वारे जोरदार वाहू लागले ...

सुनील पाटील

जळगाव : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठविल्याने पोलीस दलातही आता बदल्यांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शासन नियमाप्रमाणे यंदा १५ टक्के बदल्या होणार असून त्या आकडेवारीनुसार जिल्हा पोलीस दलात ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जावरून ३० टक्के पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेतच बदली हवी आहे. त्यासाठी अनेकांनी मंत्री, आमदार, खासदार व ओळखीच्या अधिकाऱ्यांमार्फत फिल्डिंग लावली असून काही जणांना स्थगिती हवी आहे.

खंडित, अखंडित सेवेत ज्यांना एका उपविभागात बारा वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांनीही यंदा स्थगिती मागितली आहे. गेल्या वर्षी तसेच दोन वर्षांपासून स्थगिती मागणाऱ्यांनीदेखील यंदा स्थगिती मागितली आहे. दरम्यान, शासन नियमानुसार १५ टक्के याप्रमाणे ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. परंतु ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संख्या ६५२ इतकी होत आहे.

काय आहे शासन आदेश?

कोविड-१९ चे कारण व तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सरकारी विभागातील बदल्यांना ३० जूनपर्यंत देण्यात आलेली स्थगिती शासनाने उठविली आहे. मर्यादित स्वरूपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. मात्र सर्वसाधारण बदल्या या ३१ जुलैच्या आतच कराव्या लागणार आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी झालेला असला तरी पोलीस दलासाठी अद्याप महासंचालकांचा आदेश झालेला नाही.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या -६५२

कोणत्या उपविभागातून किती?

जळगाव उपविभाग-११५

भुसावळ उपविभाग-६५

मुक्ताईनगर उपविभाग-४१

फैजपूर उपविभाग-३१

चाळीसगाव उपविभाग-८३

पाचोरा उपविभाग-५४

अमळनेर उपविभाग-५२

चोपडा उपविभाग-४२

पोलीस मुख्यालय -८६

जिल्हा विशेष शाखा-११

स्थानिक गुन्हे शाखा-१८

शहर वाहतूक शाखा-१२

उपविभागीय कार्यालय व इतर शाखा-४२

या पोलीस ठाण्यांना पसंती

स्थानिक गुन्हे शाखा - स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असून प्रभावी शाखा म्हणून याकडे पाहिले जाते. ही शाखा थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात असते. या शाखेकडे जाण्याचे दोन उद्देश असतात. प्रभावी कामगिरी करायला या शाखेत वाव आहे, दुसऱ्या अर्थकारणाशी संबंधित अनेक प्रकरणे या शाखेकडे असतात. वाळू, गुटखा, अवैध दारू व गुन्हेगारीवर या शाखेचा प्रभाव असतो.

शहर वाहतूक शाखा - शहर वाहतूक शाखा एका अर्थाने कटकटीची शाखा मानली जाते. दुसरी बाजू अशी आहे की, रोज येथे वाहनधारकांशी संबंध येतो. महामार्गावर ड्युटी लागते. वाहन तपासणीचे अधिकार व इतर बाबी आहेतच.

चाळीसगाव - चाळीसगाव व पाचोरा या दोन पोलीस ठाण्यांची हद्द मोठी आहे. क्रीम पोलीस ठाणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. वाळू, गुटखा व अवैध दारूचे प्रमाण या भागात जास्त आहे. या उपविभागात शक्यतो आयपीएस अधिकारी नियुक्त होत नाही.

मुक्ताईनगर, जामनेर नको रे बाबा !

मुक्ताईनगर पोलीस ठाणे - मुक्ताईनगर, जामनेर व पहूर पोलीस ठाण्याला अनेक जण नाक मुरडतात. या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने काम करताना रोषाला सामोरे जावे लागते.

जिल्हा पेठ - जळगाव शहरातील जिल्हा पेठ व जळगाव शहर या दोन पोलीस ठाण्यांमध्ये काम करायला वावच नाही. जिल्हा पेठ पोलीस तर बंदोबस्त करणारे पोलीस ठाणे झालेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतत आंदोलने सुरू असल्याने तेच काम करावे लागते. त्याशिवाय गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे.