शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला जरी पूर्ण केली कहाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:37 IST

मी नवदुर्गा- सरलाबाई चौधरी

नाव : सरलाबाई मोतीलाल चौधरीव्यवसाय : चाळीसगाव पोस्ट कार्यालयात मेल वितरकनोंद घेण्यासारखे कार्य :पती निधनानंतर नोकरी स्वीकारलीपाच मुलींचे विवाह केले एकटीनेबसस्थानकात दरदिवशी सात तास थांबून टपाल पिशव्यांची करतात पोहचआजारावर माती करीत ओढला संसाराचा गाडाअल्प शिक्षित असूनही मुलींना शिकवलेचाळीसगाव बसस्थानकावर दरदिवशी 'तिची' लगबग सुरुच असते. बसमध्ये टपाल पिशव्यांची पोहच करण्याचे काम ती करते. दुपारी एकपर्यंत तिची धावपळ सुरुच असते. तिच्या याच धावपळीने संसाराला आधार मिळाला. पतीच्या निधनानंतर अर्ध्यावरती मोडलेला डाव तिने जिद्दीने पुढे रेटला. कष्टक-यांमधील नवदुर्गा म्हणून सरलाबाई मोतीलाल चौधरी वेगळ्या ठरतात. गेल्या १४ वर्षापासून त्या एकाकी परिस्थितीशी सामना करीत आहे. पतीच्या निधनाचा घाव पचवून त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसत पदर खोचला. पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण करीत हातही पिवळे केले. 'कुटूंबकर्ती' म्हणूनही सरलाबाई इतरांच्या मनपटलावर प्रेरणेची माळच फुलवतात.सरलाबाई यांचे पती हे चाळीसगाव पोस्ट कार्यालयात नोकरीस होते. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले. भरल्या संसारात असा अंधार दाटल्यानंतर अल्पशिक्षित सरलाबाई काही काळ कोलमडल्या. तथापि पाच मुलींचे गोंडस चेहरे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरीची संधी मिळाली. २००८ मध्ये मोठ्या जिद्दीने त्या पोस्ट सेवेत रुजू झाल्या. गेल्या १४ वर्षात खचून न जाता संसाराचा गाडा ओढला. संघर्षाच्या १४ वर्षात त्यांनी पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे हातही पिवळे करुन दिले. पाचही मुली त्यांच्या सुखी संसारात रमून गेल्या आहेत.सरलाबाईंनी बेलगंगा पोस्ट कार्यालयात सेवेला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षापासून त्या चाळीसगाव कापड गिरणी पोस्ट कार्यालयात मेल वितरक म्हणून काम करीत आहे. बसस्थानकात टपाल पिशव्यांची बसमध्ये पोहच करण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली आहे. सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत त्यांची बसस्थानकात धावधाव सुरू असते. कठीण परिस्थितीत दुःखाला कवटाळत न बसता सरलाबाई संकटांना भिडल्या. आर्थिक संकटेही त्यांनी पेलली. मात्र आयुष्यावर 'शतदा प्रेम' करावे, असं म्हणत त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मध्यंतरी आजारानेदेखील या दुर्गेची परीक्षा घेतली. यातही सरलाबाईंनी नेटाने आजाराला परतवून लावले. कर्म ही पूजा केली की, परमेश्वर मदतीसाठी धावून येतोच, असं मोठ्या आत्मविश्वासाने त्या सांगून जातात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव उजळून निघतात.

टॅग्स :Navratriनवरात्रीChalisgaonचाळीसगाव