वस्त्रोद्योग उभारणीने मिळेल रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST2021-07-26T04:14:48+5:302021-07-26T04:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : जिल्ह्यातील ८० टक्के कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने बाहेर जातो. जिल्ह्यातच टेक्सटाईल व वस्त्रोद्योग उभारल्यास ...

वस्त्रोद्योग उभारणीने मिळेल रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : जिल्ह्यातील ८० टक्के कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने बाहेर जातो. जिल्ह्यातच टेक्सटाईल व वस्त्रोद्योग उभारल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी रविवारी येथे झालेल्या नोकरी मेळाव्यात केले.
राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाकडून बोहरा सेंट्रल शाळेत झालेल्या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन गुजराथी यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर होते. गुजराथी यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटिलिजन्स धोकादायक आहे. त्याच्याकडे डोके आहे, पण हृदय नाही. आमच्या युवकांजवळ बुध्दिमत्ता व हृदय दोन्ही आहे. संजय गरुड यांच्या कल्पकतेतून होत असलेल्या मेळाव्यातून रोजगाराच्या संधी आपल्यापर्यंत पोहचत आहे.
देवकर यांनी सांगितले की, नोकरी मिळणे अवघड झाल्याने शिक्षण घेऊनही युवक बेरोजगार होत आहे. नोकरी मिळवून देणे महत्त्वाचे काम असून हा उपक्रम चांगला आहे. सुरुवातीला संजय गरुड यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी स्वागत केले. सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किशोर पाटील, प्रदीप लोढा, भगवान पाटील, सरोजिनी गरुड, ज्ञानेश्वर बोरसे, पप्पू पाटील, विलास राजपूत, अनिल बोहरा, डी. के. पाटील, प्रल्हाद बोरसे, संदीप हिवाळे, किशोर खोडपे, माधव चव्हाण उपस्थित होते. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.