शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

अमळनेरात कोरड्या विहिरींना पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:45 IST

साडे चार हजार हेक्टर शेतीसह ३५ गावांना फायदा

अमळनेर : ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्यातून सोडलेले पाणी भाल्या नाल्यापर्यंत पोहचल्याने तब्बल २५ वर्षांपासून कोरड्या असलेल्या विहिरी झिरपू लागल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. हे बंधारे दुरुस्त होऊन भाल्या आणि लौखी दोन्ही नाल्यांचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यातील साडे चार हजार हेक्टर शेतीला व ३५ गावांना फायदा होणार आहे, अशी माहिती पंचायत समिती माजी सभापती डॉ. दीपक पाटील यांनी दिली.गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर तालुक्यातील भाल्या आणि लौखी या दोन नाल्यांमधून पांझरा नदीचे पाणी सोडण्यात यावे ही मागणी जोर धरत होती. त्याला आमदार स्मिता वाघ यांनी पुष्टी दिली आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पांझरा- माळण नदी जोड, मांडळ व मुडी फड बंधारे दुरुस्ती, नाला खोलीकरणाच्या सर्वेक्षणसाठी २० लाख रुपये मंजूर केले आणि धुळे जिल्ह्याने निधी नसताना यांत्रिक विभागाच्या मदतीने विविध यंत्र वापरून नाले खोलीकरण सुरू केले आणि योगायोगाने पांझरेचे आवर्तन सोडण्यात आले. यात तूर्त दीड किमी पर्यंत झालेल्या कामाची चाचणी घेण्यात आली व ती यशस्वी झाली.खान्देशातील पांझरा, मोसम, बोरी, बुराई, गोमाई आदी मोजक्या नद्यांवर अनेक वर्षांपासून ब्रिटिशकालीन, होळकर कालीन बंधारे असून या बंधाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही ऊर्जा न वापरता कमी अधिक प्रवाहातदेखील पाण्याला वळण देऊन नदी काठावरून इतर नाले व चारीतून पाणी परिसरात पोहचते. यात पाणी वाया जात नाही आणि नदी व नाले दोघे ठिकाणी प्रवाह सुरू राहतो त्यामुळे परिसरात पाणी पातळी वाढून शेतीलाही उपयोगी पडते.मात्र हे बंधारे ३० ते ४० वर्षांपासून नादुरुस्त झाले असल्याने नद्यांमधून पाणी वाहून जात होते. अखेर नागरिकांच्या मागणीप्रमाणे जलतज्ज्ञ व्ही. डी. पाटील यांनी पाहणी करून ही दुरुस्ती केल्यास पाण्याचे प्रश्न सुटतील असे सांगितले.नाला खोलीकरणामुळे काही गावांमध्ये रस्त्यात नाला आल्याने मोºया बंधाव्या लागतील तसेच काही ठिकाणी तुटलेले बंधारे, नाले गळती दुरुस्ती करावी लागणार आहे. मांडळ येथे तर गावातूनच पाटचारी गेली आहे, ती दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे अनेक वर्षानंतर गावातून पाणी वाहणार आहे. या फड बंधाºयांमुळे मांडळ, मुडी, लोण, लोण सिम, लोण बुद्रुक, लोण पंचम, एकलहरे, एकतास, शहापूर, भिलाली आदी गावातून पुन्हा पाणी पांझरेत सोडले जाणार आहे.त्याचप्रमाणे पांझरा नदीवर धुळे परिसरात बंधारा बांधून पाईप लाईनद्वारे पाणी डांगर येथे पांझरेत सोडण्यात येणार असून या प्रकल्पाची कार्यवाही सुरू झाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव