शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पारोळा तालुक्यातील महिलांना रोजगार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 8:31 PM

माय ओपिनियन-

पारोळा नगरीची ओळख झाशीच्या राणीचे माहेरघर अशी आहे़ येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदताना दिसतो़ पूर्वीच्या काळी या भागात पाण्याचा गंभीर प्रश्न होता़ दुष्काळी स्थितीमुळे या भागातील महिलांचे जीवन सुकर नव्हते. पण ही समस्या जाणून येथील लोकनेतृत्वाने ती सोडविली. तसेच तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून घेऊन येथील महिला कौशल्याचा ठसा उमटवीत आहेत.तत्कालीन आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या दूरदृष्टीने व अथक प्रयत्नाने बोरी धरणाची निर्मिती झाली व पाण्याचा प्रश्न सुटला़ तसेच त्यांच्या शैक्षणिक सुधारणेच्या दृष्टीकोनातून किसान कॉलेजची निर्मिती झाली आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली़ त्यानंतर तंत्रशिक्षण महाविद्यालयाची निर्मिती झाल्याने महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वी पारोळयात बरेच हातमाग होते़ त्यामुळे खादी कपडे तयार करण्याचा रोजगार महिलांकडे होता. मात्र पुढे लघुउद्योकांना खीळ बसल्याने तो लोप पावला. तरीही येथील महिलांची कष्टाळू वृत्ती आजही कायम आहे. शेवया, पापड, कुरडया, लोणची आदी पदार्थ बनवून विक्री करण्याकडे कल वाढत गेला. त्यातून आज बचतगटामार्फत महिला उद्योजक तयार होत आहेत़ पूर्वीच्या अनिष्ट चालीरीतींना फाटा देत आजा महिला-मुली शिक्षणामुळे समाजविकासात हातभार लावताना दिसतात. भौतिक सुधारणा होऊन तसेच राहणीमान सुधारून महिला सर्व बाबतींत सुधारल्या असे म्हणता येणार नाही. खरी गरज ती वैचारिक सुधारणेची़ त्यासाठी ग्रमीण भागातील प्रत्येक मुलगी उच्चशिक्षित व्हावी, सुसंस्कृत व्हावी यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे.

-प्रा़ शुभांगी एन.मोहरीर,पारोळा