शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

संवेदनशून्य माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:27 IST

काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित मू. जे. महाविद्यालयात घडलेली घटना संवेदनशून्य मानसिकतेचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अल्पवयात ...

काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित मू. जे. महाविद्यालयात घडलेली घटना संवेदनशून्य मानसिकतेचे प्रतिक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अल्पवयात हातात आलेली बाईक, मोबाईल आणि पैसा ते कसे वापरावे यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा अभाव अशी घटना घडण्यास पूरक ठरतात.आजच्या युवा पिढीला कोणाचाही धाक राहिलेला नाही. झुंडशाहीतून आपण काहीही करु शकतो, असा विश्वास दृढ झालेला पहावयास मिळतो. टिव्ही व सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तरूणाईकडून होत आहे , मोबाईल व इंटरनेटद्वारे उपलब्ध असलेल्या गेममधून संवेदनशीलता संपते. रेसमध्ये कशीही गाडी चालविली व अपघात झाला तरी पुन्हा गाडीवर स्वार होऊन गाडी चालविता येते. दुसऱ्याला मारुन जिंकण्याचा आसुरी आनंद बळावतो. बेफिकीरी, बेभानपणा व बेजबाबदारपणा यातून बळावतो. घरातील हरविलेला संवाद व मुलांची नकार न स्वीकारण्याची वृत्ती अशा घटनेच्या मुळाशी असु शकते. मुलांच्या चुकांना पाठीशी घालणे धोकादायक ठरते. मुलांना शिक्षाही करायची नाही, यामुळेही अशी वृत्ती वाढते. आपल्याला काय करायचे? ही समाजाची प्रवृत्ती याला खतपाणीच घालते. संस्कार व शिस्तीचा अभाव तसेच भोगवादीवृत्ती अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतात. अशा घटनांच्या मुळाशी बेरोजगारी आहे असे वाटत नाही. जीवन का व कशासाठी याबाबतच्या मार्गदर्शनाचा अभावही महत्त्वाचा ठरतो.युवकांच्या प्रेरणादायी कथा समाजासमोर आणल्या जात नाही व नकारात्मक घटनांचे सर्वच माध्यमातून होणारे उदात्तीकरणही कारणीभूत ठरते.- गिरीश कुळकर्णी

टॅग्स :Jalgaonजळगाव