शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे यांची एल्गार यात्रेची घोषणा तारक की मारक ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:00 IST

खडसेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

ठळक मुद्देमहाजन व तावडे यांची अनुपस्थिती बोलकी‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ असे धोरण

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून मन मोकळे केले किंवा वर्ष-दिड वर्षांपासून मनात सुरू असलेली खदखद बाहेर काढत आता एल्गार यात्रेची घोषणा केली. हा त्यांचा पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांना तारक ठरतो की मारक? याबाबत आता राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.खडसे यांचा वाढदिवस नेहमीच चर्चेचा ठरला आहे. जिल्ह्यात कोणत्याच नेत्याचा साजरा होत नाही असा वाढदिवस त्यांचा साजरा होतो. दोन वर्षांपासून तर काहीशी वाढच झाली असल्याचे लक्षात येते.आरोप अन् त्याला सडेतोड उत्तरपुणे येथील भोसरी प्रकरणानंतर खडसेंना राजीनामा द्यावा लागला. या बाबतचे आरोप सुरू असतानाच अन्य काही आरोप त्यांच्यावर झाले. एका पाठोपाठ एक आरोप होत राहीले तरी खडसे डगमगले नाहीत. त्यांनी या स्थितीवर मात करत ‘अभिमन्यूची’ भूमिका बजावत सर्व आरोपांना सडेतोड उत्तरे दिली. ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. जे आरोप झाले त्यातून बऱ्याच बाबतीत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. मात्र त्यानंतर जी पाऊले पक्षाकडून त्यांना अपेक्षित होती ती पडली नाहीत. त्याचा त्रागा खडसेंकडून होत आहे. विविध पातळ्यांवर त्यांनी केलेला त्रागा त्यांच्या कृतीतून उमटत गेल्याने अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मग एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सह संघटन मंत्री किशोर काळकर असे एक ना अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले आहेत. हे प्रकार लक्षात घेऊन ते काहीसा सावध पवित्रा घेतील असे अनेकांना वाटत होते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ते अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. मग जिल्ह्यात काही कार्यक्रम असो वा विधासभेतील अधिवेशन काळ ते पक्ष धोरणाविरोधातच भूमिका व्यक्त करत आले असल्याचे लक्षात येत आहे.महाजन, तावडे दूरच राहीलेजलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यातील वैर आता नवीन नाही. एकमेकांविरूद्ध बोलणे, टोमणे मारणे हे उघडपणे सुरू असते. मुक्ताईनगर येथील कार्यक्रम पत्रिकेवर गिरीश महाजन यांचे नाव होते मात्र त्यांनी तेथे टाणे टाळले. तसेच उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे वाढदिवस कार्यक्रम व अल्पसंख्यांकांसाठीच्या मुक्ताईनगर येथे झालेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास आलेच नाहीत. महाजनांची अनुपस्थिती समजू शकते मात्र विनोद तावडे यांची अनुपस्थिती खटकणारी आहे.पालकमंत्री आले पण...मुक्ताईनगरला झालेल्या वाढदिवस सोहळ्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे अगत्याने आले. खडसेंसारखा नेता पक्षापासून दूर जाऊ नये अशी त्यांची या मागील भूमिका असल्याचे जाणकार सांगतात. मात्र व्यासपीठावरून खडसेंनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना संवेदनशील चंद्रकांत पाटील यांनाही बोचतील अशाच होत्या.‘एल्गार’ची भूमिका कितपत योग्य?खडसे हे आता मंत्रीमंडळात जाण्यास फारसे उत्सुक नाहीत असे त्यांचे समर्थक सांगतात मात्र त्यांचे निर्दोषत्व जाहीरपणे मांडले जाणे, अधिवेशन काळात त्यावर भाष्य तेदेखील मुख्यमंत्र्यांकडून होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र नेमका हाच विषय टाळला जात आहे. त्यामुळे अनेक पातळ्यांवर त्रागा व्यक्त करूनही उपयोग न झाल्याने आता एल्गार यात्रेचे अस्त्र खडसेंनी उपसले आहे. याला कितपत पाठींबा देईल, हे येता काळच ठरवेल. खडसेंचे हे अस्त्र कितपत योग्य हे काळ ठरवणार असला तरी आगामी काळात विविध निवडणुका आहेत. त्यांची ही भूमिका त्रासदायकही ठरू शकते. आता त्यांच्या ‘एल्गार’वर पक्ष काय दखल घेतो, की नेहमी प्रमाणे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ असे धोरण समोर येते हे लवकरच समजेल.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव