शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'गिरीश महाजन यांनी लोकसभा लढवावीच...'; एकनाथ खडसेंचे आव्हान

By सुनील पाटील | Updated: January 6, 2024 18:53 IST

३० वर्षापासून पराभव म्हणून रावेरची मागणी

जळगाव : रावेरची जागा राष्ट्रवादीला सुटली तर आपणच उमेदवार असू, मंत्री गिरीश महाजन यांनी पळ न काढता लोकसभा निवडणूक लढवावीच असे खुले आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे. रावेर मतदारसंघात कॉग्रेसचा ३० वर्षापासून मोठ्या फरकाने पराभव होत आला आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. येत्या आठ दिवसात जागा वाटप होतील तेव्हा सारेच स्पष्ट होईल, असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी शनिवारी जळगावातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रावेरची जागा आमची असल्याचे सांगितले, ते त्यांचे म्हणणे स्वाभाविक आहे. शेवटी आघाडी ठरवेल कोणती जागा कोणाला द्यायची ते. कॉग्रेसला जागा सुटली तर डॉ.उल्हास पाटील किंवा अन्य कोणी उमेदवार असले तर त्यांना निवडून आणू. भाजपमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तुम्ही परत जाणार का? या प्रश्नावर खडसे म्हणाले, तावडे माझे चांगले मित्र आहेत. एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना माझ्याविषयी सहानुभूती आहे. जुने लोक आले तर ताकद वाढेल असे त्यांना वाटते. मात्र भाजपने माझा जो छळ केला आहे, त्यामुळे मी कदापीही भाजपात जाणार नाही. आताच इडी आणि एसीबीचा जामीन घेतला आहे. शिवाय मी अजून पाच वर्ष आमदार आहे.

जळगावच्या जागेसाठी प्रभावशाळी व्यक्तीची इच्छा

जळगावची जागाही आम्ही मागितली आहे. या मतदारसंघातील एक प्रभावशाली व्यक्ती आहे, जी राजकारणात नाही. पण त्यांनी या जागेवर निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवारांकडे व्यक्त केली आहे. आठ महिन्यापूर्वी पवार व ही व्यक्ती विमानात सोबत होते, तेथेच ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी सांगितले.

डॉ.केतकी पाटील भाजपकडून लढणार

डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसचे आहेत. त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप त्यांच्या संपर्कात किंवा ते भाजपच्या संपर्कात असावेत. त्या भाजपकडून लढणार असेही ऐकतो आहे. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही. रक्षा खडसे किंवा गिरीश महाजन यांच्या तिकिटाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होईल.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेElectionनिवडणूकJalgaonजळगाव