शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:28 PM

मनपा निवडणुकीत झाले होते ५७ टक्के मतदान

जळगाव : लोकसभेसाठी २३ रोजी झालेल्या मतदानात जळगाव शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत जळगाव शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. केवळ आठ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत ८ टक््क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाकडून विचारमंथन सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जळगाव मतदार संघात भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत रंगलेली पहायला मिळाली. तसेच निवडणुकीआधी भाजपाकडून विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारादरम्यान अमळनेर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यामुळे भाजपा नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून मतदान काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात भाजपाचे ५७ नगरसेवक असताना शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापमानाचाही परिणाममनपा निवडणुकीच्या वेळेस पावसाळा असल्याने तापामान जास्त नव्हते. मात्र, २३ रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी ४२ अंश सेल्सीअस तापमान असल्यामुळे दुपारी १२ पर्यंत चांगले मतदान झाले. दुपारून मात्र मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर निघाले नाहीत.मनपाची पुनरावृत्ती न झाल्याने नगरसेवक झाले नाराजभाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत देखील मनपा निवडणुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होईल अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने पैसेवाटप न करण्यावर भर दिला. तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे काम बाहेरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविल्यामुळे देखील नगरसेवक नाराज असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उपस्थित राहून केवळ औपचारिकता बजावल्याचे पहायला मिळाले. मतदान काढण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव