अरं...भाऊ काय करू या रस्त्यांचं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:19+5:302021-07-22T04:12:19+5:30
जागो-जागी लहान-मोठे खड्डे...धूळ...आणि आता पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे गल्ली-बोळांमध्ये झालेले चिखल...यामुळे नागरिकांना साधे पायी चालणे कठीण झाले आहे. अरं ...

अरं...भाऊ काय करू या रस्त्यांचं..
जागो-जागी लहान-मोठे खड्डे...धूळ...आणि आता पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे गल्ली-बोळांमध्ये झालेले चिखल...यामुळे नागरिकांना साधे पायी चालणे कठीण झाले आहे. अरं बाबा... कधी होणार या रस्त्यांची कामं...आता तर वैताग आलाय, या पेक्षा तर खेडी तरी बरी अशी कुजबूज बसस्थानक परिसरात प्रवाशांमध्ये सुरू होती.
अमृत योजनेंतंर्गत केलेल्या खड्ड्यांची थातूरमातूर दुरूस्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे घराबाहेरच प्रचंड चिखल नागरिकांना पहायला मिळत आहे. परिणामी, या चिखलातून वाट काढावी लागत आहे. रात्रीच्यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यात दुचाकीचे चाक अडकून अपघात होत आहेत. ही समस्या कधी सुटणार बाबा? केवळ मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे़ गल्ली-बोळातील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार, असाही प्रश्न चर्चेतून उपस्थित होत होता.