शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे : डॉ. अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:37 IST

जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले.

ठळक मुद्देग्रामीण बदलांसाठी ठोस उपायांची गरजचाळीसगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे अधिवेशन'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा विद्यार्थी आणि युवकांना दिला संदेश

जिजाबराव वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले. विद्यार्थी आणि युवकांना 'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा संदेशही त्यांनी दिला.मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने डॉ. काकोडकर हे चाळीसगावला आले होते. मुलाखतीत त्यांनी आपली मते व्यक्त केली.प्रश्न: आजचे शिक्षण नवी आवाहने पेलण्यास सक्षम आहे का?डॉ. काकोडकर : माझे उत्तर 'नाही' असे आहे. हा विषय मोठा असला तरी, सरधोपटपणे चालणारे शिक्षण डिजिटल युगात कालबाह्य झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही हे बदल स्विकारावे लागतील.प्रश्न: शाळा, महाविद्यालयांचे स्वरुप बदलले पाहिजे ?डॉ. काकोडकर : हो, निश्चितपणे. अभ्यासक्रमच नव्हे तर शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रीत असायला हवी. जगात उलथापालथ होत असतांना हे बदल स्वीकारले नाहीत तर आपण मागे पडू.प्रश्न: अधिवेशने, प्रदर्शने, उपक्रमांमुळे काही फायदा होतो का?डॉ. काकोडकर : विज्ञान परिषदेचे अधिवेशन, उपक्रम याव्दारे सूचना, विचार यांना व्यासपीठ मिळते. उपक्रमही पथदर्शी असले पाहिजेत. विचारांचे आदान - प्रदान झाल्याने काहीतरी दिशादर्शक होऊ शकते.प्रश्न: ग्रामीण भागातील बदलांसाठी काय उपाय सुचवाल ?डॉ. अनिल काकोडकर: नव्या तंत्रज्ञानाचे बोट पकडून शेती व्यवसाचा चेहरा - मोहरा बदलता येईल. डिजिटल बदलांमुळे हे शक्य आहे. एखादे विद्यापीठ ग्रामीण भागात का नको? या प्रश्नांच्या उत्तरात ग्रामीण बदलांच्या पाऊलखुणा आहेत.प्रश्न: अणुउर्जा निर्मितीची गती मंदावली आहे का ?डॉ. काकोडकर: वातावरणातील बदल, कार्बनमुक्त उर्जा ही आवाहने स्विकारुन पुढे जायचे आहे. त्यामुळे ज्या गतीने या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे. ते होत नाहीए. यासाठी उर्जेचे नवे पर्याय शोधावे लागतील. रिन्युएबल एनर्जी म्हणजेच नुतनीकरणक्षम उर्जा हा त्यावर पर्याय आहे.