शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे : डॉ. अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:37 IST

जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले.

ठळक मुद्देग्रामीण बदलांसाठी ठोस उपायांची गरजचाळीसगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे अधिवेशन'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा विद्यार्थी आणि युवकांना दिला संदेश

जिजाबराव वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले. विद्यार्थी आणि युवकांना 'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा संदेशही त्यांनी दिला.मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने डॉ. काकोडकर हे चाळीसगावला आले होते. मुलाखतीत त्यांनी आपली मते व्यक्त केली.प्रश्न: आजचे शिक्षण नवी आवाहने पेलण्यास सक्षम आहे का?डॉ. काकोडकर : माझे उत्तर 'नाही' असे आहे. हा विषय मोठा असला तरी, सरधोपटपणे चालणारे शिक्षण डिजिटल युगात कालबाह्य झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही हे बदल स्विकारावे लागतील.प्रश्न: शाळा, महाविद्यालयांचे स्वरुप बदलले पाहिजे ?डॉ. काकोडकर : हो, निश्चितपणे. अभ्यासक्रमच नव्हे तर शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रीत असायला हवी. जगात उलथापालथ होत असतांना हे बदल स्वीकारले नाहीत तर आपण मागे पडू.प्रश्न: अधिवेशने, प्रदर्शने, उपक्रमांमुळे काही फायदा होतो का?डॉ. काकोडकर : विज्ञान परिषदेचे अधिवेशन, उपक्रम याव्दारे सूचना, विचार यांना व्यासपीठ मिळते. उपक्रमही पथदर्शी असले पाहिजेत. विचारांचे आदान - प्रदान झाल्याने काहीतरी दिशादर्शक होऊ शकते.प्रश्न: ग्रामीण भागातील बदलांसाठी काय उपाय सुचवाल ?डॉ. अनिल काकोडकर: नव्या तंत्रज्ञानाचे बोट पकडून शेती व्यवसाचा चेहरा - मोहरा बदलता येईल. डिजिटल बदलांमुळे हे शक्य आहे. एखादे विद्यापीठ ग्रामीण भागात का नको? या प्रश्नांच्या उत्तरात ग्रामीण बदलांच्या पाऊलखुणा आहेत.प्रश्न: अणुउर्जा निर्मितीची गती मंदावली आहे का ?डॉ. काकोडकर: वातावरणातील बदल, कार्बनमुक्त उर्जा ही आवाहने स्विकारुन पुढे जायचे आहे. त्यामुळे ज्या गतीने या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे. ते होत नाहीए. यासाठी उर्जेचे नवे पर्याय शोधावे लागतील. रिन्युएबल एनर्जी म्हणजेच नुतनीकरणक्षम उर्जा हा त्यावर पर्याय आहे.