शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लवकर; यंदा कापसाचे क्षेत्र ५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:26 IST

कृषी विभागाचा अंदाज : शेतकऱ्यांचा कल तृणधान्यांकडे राहणार

जळगाव : यंदा मान्सूनचे आगमन गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडे लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीदेखील खरीप हंगामाची तयारी सुरु केली असून यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी अधिक होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक संकटे झेलणाºया शेतकºयाला यंदाचा मान्सून तरी दिलासा देईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तृणधान्याचा क्षेत्रात वाढ होणारयंदाच्या खरीप नियोजनानुसार मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात घट तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत वाढ होणार आहे. सोयाबीनचे बियाणे देखील भरपूर आहे. मात्र, लष्करी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने १ जूननंतरच पेरणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांनी लवकर पेरणी करू नये म्हणून २५ मे नंतर बाजारात बियाणे उपलब्ध होणार आहे.कर्जपुरवठा कमी झाल्याने होणार परिणामयंदा खरीपाच्या क्षेत्रात अजून काही प्रमाणात वाढ झाली असती मात्र, पीककर्ज पुरवठा चांगल्या प्रकारे न झाल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णात कर्जपुरवठा २ हजार ९२७ कोटींचा आराखडा असताना केवळ २८२ कोटींचे वाटप झाले आहे. यंदा लॉकडाऊन झाल्यामुळेरब्बीच्या पिकांची खरेदीअद्याप झालेली नाही. गेल्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकºयांचा घरात पडून आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा पुरवठा न झाल्यास शेतकºयांना खरीपाची तयारी करण्यास आर्थिक अडचणी निर्माण होवू शकतात.३७ हजार हेक्टर क्षेत्र वाढणारगेल्या वर्षी जून ते आॅक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १४४ टक्के पाऊस झाला होता. शिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस झाला होता. यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख २८ हजार ७४४ हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७५ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्णात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणीजिल्ह्णात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्णात ५ लाख १० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख २५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.मुख्यमंत्री आज घेणार आढावा... मुख्यमंत्री गुरुवारी खरीप हंगामाचा आढावा घेणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याच्या स्थितीची माहिती देणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव