शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 11:35 IST

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

महिंदळे, ता. भडगाव : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या अकरावा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी व बोगस शेतकरी शोधण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र केवायसी करण्याकरिता शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी तासनतास सीएससी सेंटरवर बसलेले दिसतात.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात आर्थिक मदत मिळावी, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करून योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून, आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ई-केवायसीची पूर्तता केली तरच अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु सध्या ई केवायसी करण्याकरिता अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सीएससी सेंटरमध्ये तासनतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर कधीकधी ई केवायसी चालू असताना अचानक बंद होत आहे तसेच काही शेतकऱ्यांचे हाताच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांना केवायसी करिता मुकावे लागत आहे.

३१ मार्च शेवटची तारीखदेशभरात ११ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादीनुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये, यासाठी आता ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी या योजनेतील १०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण, आता केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ११व्या हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कधी साईट चालत नाही तर कधी केवायसीवेळी हाताच्या बोटाचे ठसेच येत नसल्यामुळे केवायसी कशी पूर्ण करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहू लागला आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी