शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जळगावात पत्याच्या अड्डयावर झालेल्या वादानंतर प्रौढाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:19 IST

जिजाऊनगरातील रहिवासी

ठळक मुद्देखून करुन मृत्यदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोपजखमा असलेला मृतदेह आढळला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - पत्याच्या अड्डयावर झालेल्या वादानंतर घरातून गायब झालेले तुळशीराम मलखान राठोड (वय ४५ रा. जिजाऊ नगर, वाघ नगर, जळगाव, मुळ रा.मांडवे दिगर, ता. भुसावळ) यांचा सोमवारी सकाळी सावखेडा शिवारात रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राठोड यांचा खून झालेला असून आत्महत्या भासविण्यासाठी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम राठोड यांंचा रविवारी दुपारी चार वाजता वाघ नगर परिसरातील पत्याच्या अड्ड्यावर वाद झाला होता. मस्करी करताना राठोड यांनी एकाला मारले होते.त्यानंतर मार खाणाºया व्यक्तीने हा प्रकार त्याच्या भावाला सांगितला. थोड्या वेळाने दोन्ही भावंडे राठोड यांना शोधत आले. त्यांना बेदम मारहाण करुन ‘तुला बघूनच घेतो’ रात्री येताच अशी धमकी देत निघून गेले होते. या घटनेनंतर राठोड प्रचंड तणावात होते. घरी आल्यानंतर मुलांना व नातेवाईकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. दरम्यान, रात्री आठ वाजता मुलाजवळून पाचशे रुपये घेऊन मी आलोच असे सांगून घराबाहेर पडले, ते परतलेच नाहीत. सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून ैआला.दरम्यान, राठोड यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीची शुध्द हरपली. घरी इतकी गर्दी कशासाठी झाली? म्हणून ते विचारत होते. नातेवाईकांनी उशिरापर्यंत पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना दिलीच नाही. तिन्ही मुलांनी मात्र जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शालक रतन पवार अन्य लोकांनी या मुलांना धीर दिला.का वाटतो घातपाताचा संशय?संकट काळात धावून जाणारे तुळशीराम राठोड हे आत्महत्या करु शकत नाही असा ठाम विश्वास मुलगा व शालक रतन पवार यांनी व्यक्त केला आहे. राठोड यांच्या डोक्याला, तोंडाला मार लागला आहे. त्यामुळे त्यांचा घातपातच झाला आहे. आत्महत्या केली असती तर त्यांचा मृतदेह फरफटत गेला असता किंवा शरीराचे तुकडे झाले असते असा कोणताच प्रकार येथे झालेला नाही. शिवाय वाद घालणाºयांनी धमकी दिली होती, त्यामुळे हा खूनच असल्याचा आरोप पवार यांनी केला. अंत्यविधी झाल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जखमा असलेला मृतदेह आढळलावडील घरी आले नाही म्हणून मुलगा लखन, पवन व राजा या तिघांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी ते रेल्वे रुळाकडे शोध घेत असताना ट्रॅकमन धनराज रामचंद्र ठाकरे यांना सावखेडा शिवारात जळगाव-शिरसोली लाईनवर खांब क्र.४१५/१२-१४ येथे अंगावर जखमा असलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, मुलगा लखन याने घटनास्थळावरच वडीलांचा मृतदेह ओळखला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.राठोड हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा