शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल, साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:52 IST

पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे ५०० नागरिकांना वेदनाशामक मलम वाटप करून गांधीगिरीआरोप-प्रत्यारोपात जनतेचे मात्र हाल

वासेफ पटेलभुसावळ : पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम भुसावळ पालिकेने हाती घेण्याची इच्छासुद्धा दाखवली नाही. परिणामी लोकांनी, वाहनचालकांनी ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ अशी शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे सोमवारी भुसावळ शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ‘पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका’ अशा सूचना प्रवाशांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले. तालुका संघटक धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बºहाटे, विभागप्रमुख निखिल बºहाटे, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.आरोप प्रत्यारोपात जनतेचे हालफक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर पालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते? पालिका निवडणुकीत इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधाऱ्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. अन्यथा सत्ताधाऱ्यांवर भुसावळकरांना खड्ड्य़ात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणण्याची वेळ येईल, सत्ताधाºयांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे म्हणाले.भुसावळकरांना झेंडू बाम व आयोडेक्सच्या बाटल्या दिल्यामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले. तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणाºया महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणाºयांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधाºयांना खड्डे कमी करता आले नाही. परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी ५०० प्रवाशांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले.खड्ड्यांना नागरिक वैतागलेसत्ताधाºयांना समाजाचे काहीही सोयरसुतक नाहीय. ‘जनता गेली खड्ड्यात’ असंच त्यांचं वागणं आहे. कोणता नगरसेवक कोणत्या पक्षाकडून पुढील निवडणूक लढेल यातच त्यांना रस आहे. नगरसेवक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच आता वॉर्डात चांगले कार्य करणाºया आजी माजी नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पदरमोड सुरू केली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.गाडी, सायकल किंवा कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. विस्तारलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांवर ‘भिक नको पण कुत्रा आवर,’ असे म्हणण्याची पाळी आली आहे, असे नागरिक म्हणाले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ