शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल, साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:52 IST

पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे ५०० नागरिकांना वेदनाशामक मलम वाटप करून गांधीगिरीआरोप-प्रत्यारोपात जनतेचे मात्र हाल

वासेफ पटेलभुसावळ : पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम भुसावळ पालिकेने हाती घेण्याची इच्छासुद्धा दाखवली नाही. परिणामी लोकांनी, वाहनचालकांनी ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ अशी शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे सोमवारी भुसावळ शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ‘पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका’ अशा सूचना प्रवाशांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले. तालुका संघटक धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बºहाटे, विभागप्रमुख निखिल बºहाटे, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.आरोप प्रत्यारोपात जनतेचे हालफक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर पालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते? पालिका निवडणुकीत इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधाऱ्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. अन्यथा सत्ताधाऱ्यांवर भुसावळकरांना खड्ड्य़ात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणण्याची वेळ येईल, सत्ताधाºयांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे म्हणाले.भुसावळकरांना झेंडू बाम व आयोडेक्सच्या बाटल्या दिल्यामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले. तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणाºया महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणाºयांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधाºयांना खड्डे कमी करता आले नाही. परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी ५०० प्रवाशांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले.खड्ड्यांना नागरिक वैतागलेसत्ताधाºयांना समाजाचे काहीही सोयरसुतक नाहीय. ‘जनता गेली खड्ड्यात’ असंच त्यांचं वागणं आहे. कोणता नगरसेवक कोणत्या पक्षाकडून पुढील निवडणूक लढेल यातच त्यांना रस आहे. नगरसेवक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच आता वॉर्डात चांगले कार्य करणाºया आजी माजी नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पदरमोड सुरू केली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.गाडी, सायकल किंवा कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. विस्तारलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांवर ‘भिक नको पण कुत्रा आवर,’ असे म्हणण्याची पाळी आली आहे, असे नागरिक म्हणाले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ