शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:34 IST

तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात ५४ टक्के गाळाचे प्रमाणकेवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लकगाळ व बाष्पीभवनामुळे आटणार पाणी

रावेर, जि.जळगाव : तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.हतनूर सिंचन प्रकल्पाचा एकूण जलसाठा ३८८ दलघमी आहे. यंदा तापी व पूर्णा नदीतून मान्सुनोत्तर जलप्रवाहाची आवक यंदा शून्य राहिल्याने वाढते तापमान व प्रकल्पात साधारणत: ५४ टक्के गाळाचे प्रमाण आहे. यामुळे आजमितीस ५०.५१ टक्के जलसाठा आटल्याने केवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.हतनूर प्रकल्पाचा मृत जलसाठा १३३ दलघमी असल्याने त्यातील केवळ ६३ दलघमी जिवंत जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. त्यात प्रकल्पातील ५४ टक्के गाळाचे वाढते प्रमाण पाहता ३४ दलघमी गाळाचा साठा आहे. ‘मे हिट’सदृश्य तापमानाचा धडाका मार्च अखेरपासूनच सुरू झाल्याने दररोज या प्रकल्पातून ०.२५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे भीषण व धोकादायक प्रमाण आहे. हे पाहता तापमानात आणखी वाढ झाल्यास या कोरड्या उन्हाळ्यात जूनअखेरपर्यंत सुमारे २० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व भूस्तरही कोरडाठक्क असल्याने झिरपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकंदरीत, या ६३ दलघमी उपलब्ध जलसाठ्यातून ५४ दलघमी गाळामुळे व बाष्पीभवनामुळे आटणार असेल तर जूनअखेरपर्यंतच्या ८३ दिवसांपर्यंत केवळ नऊ दलघमी उपलब्ध जलसाठ्यात बिगर सिंचन २१ पाणी वापर संस्थांच्या आरक्षित ४८ दलघमी पाण्याचे नियोजनासाठी तुटपुंंजे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आयुध निर्माणी फॅक्टरी वरणगाव, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी, मुक्ताईनगर, संत मुक्ताई शुगर फॅक्टरी मुक्ताईनगर, नांदुरा तालुक्यातील २७ गावांची पाणीपुरवठा योजना, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा, कुºहे, टाकळी, महालखेडा, काकोडा, वढवे, बोदवड, कोºहाळा, ८१ गावांची बोदवड व तळवेल पाणीपुरवठा योजना, अकोला एमआयडीसी, मलकापूर, मुक्ताईनगर, रावेर व सावदा न.पा. तथा गहूखेडा सामूहिक पाणीपुरवठा योजना या २१ संस्थांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करण्याच्या तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी अत्यावश्यक ते निर्बंध आणण्याबाबत हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी.महाजन यांनी सूचित केले आहे.तातडीची वा पर्यायी व्यवस्थेचे आवाहनहतनूर प्रकल्पाची माहे मे व जूनमध्ये जलपातळी घसरल्यानंतर दोन्ही नद्यांचे प्रवाह खंडित झाल्यास पाणीटंचाई निर्र्मूलनासाठी आपापल्या योजनांच्या उद्भवापर्यंत खंडित पाण्याचे तोड्यांपासून समांतर चारी काढून जलप्रवाह सुकर करणे वा योजनांचा सेक्शन पाईप तोड्यांपर्यंत पोहोचवण्याची तातडीची उपाययोजना करावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचे आवाहन हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी. महाजन यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर