शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:34 IST

तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात ५४ टक्के गाळाचे प्रमाणकेवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लकगाळ व बाष्पीभवनामुळे आटणार पाणी

रावेर, जि.जळगाव : तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.हतनूर सिंचन प्रकल्पाचा एकूण जलसाठा ३८८ दलघमी आहे. यंदा तापी व पूर्णा नदीतून मान्सुनोत्तर जलप्रवाहाची आवक यंदा शून्य राहिल्याने वाढते तापमान व प्रकल्पात साधारणत: ५४ टक्के गाळाचे प्रमाण आहे. यामुळे आजमितीस ५०.५१ टक्के जलसाठा आटल्याने केवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.हतनूर प्रकल्पाचा मृत जलसाठा १३३ दलघमी असल्याने त्यातील केवळ ६३ दलघमी जिवंत जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. त्यात प्रकल्पातील ५४ टक्के गाळाचे वाढते प्रमाण पाहता ३४ दलघमी गाळाचा साठा आहे. ‘मे हिट’सदृश्य तापमानाचा धडाका मार्च अखेरपासूनच सुरू झाल्याने दररोज या प्रकल्पातून ०.२५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे भीषण व धोकादायक प्रमाण आहे. हे पाहता तापमानात आणखी वाढ झाल्यास या कोरड्या उन्हाळ्यात जूनअखेरपर्यंत सुमारे २० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व भूस्तरही कोरडाठक्क असल्याने झिरपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकंदरीत, या ६३ दलघमी उपलब्ध जलसाठ्यातून ५४ दलघमी गाळामुळे व बाष्पीभवनामुळे आटणार असेल तर जूनअखेरपर्यंतच्या ८३ दिवसांपर्यंत केवळ नऊ दलघमी उपलब्ध जलसाठ्यात बिगर सिंचन २१ पाणी वापर संस्थांच्या आरक्षित ४८ दलघमी पाण्याचे नियोजनासाठी तुटपुंंजे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आयुध निर्माणी फॅक्टरी वरणगाव, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी, मुक्ताईनगर, संत मुक्ताई शुगर फॅक्टरी मुक्ताईनगर, नांदुरा तालुक्यातील २७ गावांची पाणीपुरवठा योजना, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा, कुºहे, टाकळी, महालखेडा, काकोडा, वढवे, बोदवड, कोºहाळा, ८१ गावांची बोदवड व तळवेल पाणीपुरवठा योजना, अकोला एमआयडीसी, मलकापूर, मुक्ताईनगर, रावेर व सावदा न.पा. तथा गहूखेडा सामूहिक पाणीपुरवठा योजना या २१ संस्थांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करण्याच्या तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी अत्यावश्यक ते निर्बंध आणण्याबाबत हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी.महाजन यांनी सूचित केले आहे.तातडीची वा पर्यायी व्यवस्थेचे आवाहनहतनूर प्रकल्पाची माहे मे व जूनमध्ये जलपातळी घसरल्यानंतर दोन्ही नद्यांचे प्रवाह खंडित झाल्यास पाणीटंचाई निर्र्मूलनासाठी आपापल्या योजनांच्या उद्भवापर्यंत खंडित पाण्याचे तोड्यांपासून समांतर चारी काढून जलप्रवाह सुकर करणे वा योजनांचा सेक्शन पाईप तोड्यांपर्यंत पोहोचवण्याची तातडीची उपाययोजना करावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचे आवाहन हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी. महाजन यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर