शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:34 IST

तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात ५४ टक्के गाळाचे प्रमाणकेवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लकगाळ व बाष्पीभवनामुळे आटणार पाणी

रावेर, जि.जळगाव : तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.हतनूर सिंचन प्रकल्पाचा एकूण जलसाठा ३८८ दलघमी आहे. यंदा तापी व पूर्णा नदीतून मान्सुनोत्तर जलप्रवाहाची आवक यंदा शून्य राहिल्याने वाढते तापमान व प्रकल्पात साधारणत: ५४ टक्के गाळाचे प्रमाण आहे. यामुळे आजमितीस ५०.५१ टक्के जलसाठा आटल्याने केवळ १९६ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. याची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.हतनूर प्रकल्पाचा मृत जलसाठा १३३ दलघमी असल्याने त्यातील केवळ ६३ दलघमी जिवंत जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. त्यात प्रकल्पातील ५४ टक्के गाळाचे वाढते प्रमाण पाहता ३४ दलघमी गाळाचा साठा आहे. ‘मे हिट’सदृश्य तापमानाचा धडाका मार्च अखेरपासूनच सुरू झाल्याने दररोज या प्रकल्पातून ०.२५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे भीषण व धोकादायक प्रमाण आहे. हे पाहता तापमानात आणखी वाढ झाल्यास या कोरड्या उन्हाळ्यात जूनअखेरपर्यंत सुमारे २० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व भूस्तरही कोरडाठक्क असल्याने झिरपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकंदरीत, या ६३ दलघमी उपलब्ध जलसाठ्यातून ५४ दलघमी गाळामुळे व बाष्पीभवनामुळे आटणार असेल तर जूनअखेरपर्यंतच्या ८३ दिवसांपर्यंत केवळ नऊ दलघमी उपलब्ध जलसाठ्यात बिगर सिंचन २१ पाणी वापर संस्थांच्या आरक्षित ४८ दलघमी पाण्याचे नियोजनासाठी तुटपुंंजे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आयुध निर्माणी फॅक्टरी वरणगाव, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी, मुक्ताईनगर, संत मुक्ताई शुगर फॅक्टरी मुक्ताईनगर, नांदुरा तालुक्यातील २७ गावांची पाणीपुरवठा योजना, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा, कुºहे, टाकळी, महालखेडा, काकोडा, वढवे, बोदवड, कोºहाळा, ८१ गावांची बोदवड व तळवेल पाणीपुरवठा योजना, अकोला एमआयडीसी, मलकापूर, मुक्ताईनगर, रावेर व सावदा न.पा. तथा गहूखेडा सामूहिक पाणीपुरवठा योजना या २१ संस्थांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करण्याच्या तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी अत्यावश्यक ते निर्बंध आणण्याबाबत हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी.महाजन यांनी सूचित केले आहे.तातडीची वा पर्यायी व्यवस्थेचे आवाहनहतनूर प्रकल्पाची माहे मे व जूनमध्ये जलपातळी घसरल्यानंतर दोन्ही नद्यांचे प्रवाह खंडित झाल्यास पाणीटंचाई निर्र्मूलनासाठी आपापल्या योजनांच्या उद्भवापर्यंत खंडित पाण्याचे तोड्यांपासून समांतर चारी काढून जलप्रवाह सुकर करणे वा योजनांचा सेक्शन पाईप तोड्यांपर्यंत पोहोचवण्याची तातडीची उपाययोजना करावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचे आवाहन हतनूर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एम.पी. महाजन यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर