शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुष्काळामुळे कृषी महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:39 PM

जिल्हा प्रशासनाकडून कृषी आयुक्तांना पत्र

ठळक मुद्दे एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार

जळगाव : दुष्काळ परिस्थिती आणि त्यातच निवडणुकांची शक्यता असल्याने यंदाचा जानेवारी महिन्यात होणारा कृषी महोत्सव कृषी विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचे पत्रच कृषी आयुक्तांना पाठवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी महोत्सव रद्द केला असला तरी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार असल्याचे सांगितले.कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या कृषी विभागाला मिळणाऱ्या निधीतून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भरविण्यात येतो. तर धान्य महोत्सव हा ‘आत्मा’च्या निधीतून एप्रिल महिन्यात भरविण्यात येत असतो. मात्र राज्य शासनाचा निधी हा मार्चअखेरपर्यंत खर्ची पडला पाहिजे, असे बंधनकारक असल्याने कृषी महोत्सव त्याआधीच घेणे भाग असते. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ज्वारी, बाजरी, तूर हे मार्चच्या पुढेच बाजारात येत असल्याने जानेवारी-फेब्रुवारीत कृषी महोत्सव घेऊन त्यात काय मांडायचे? असा प्रश्न असतो. त्यामुळे हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्यक्षात खरीपाचे धान्य दाखलप्रत्यक्षात मात्र खरीपाचे धान्य बाजारात दाखल झाले आहे. शासनाचेच भरडधान्य खरेदी केंद्र तसेच तूर, उडीद, मूग खरेदी केंद्रांवर देखील धान्य खरेदी सुरू आहे. खरीपाच्या उत्पन्नाचे आकडेवारी कृषी विभागाकडे जमा करणे सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी धान्याचे उत्पादनच झालेले नाही, अशी परिस्थिती नाही. तसेच धान्य जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाच बाजारात आले आहे. तरीही धान्य आलेले नसते, हा दावा कितपत खरा आहे? याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे. तर निवडणुकांची अडचण जानेवारी, फेब्रुवारीपेक्षा एप्रिलमध्येच अधिक येऊ शकते, अशी स्थिती आहे.तर कृषी तंत्रज्ञान मांडणे झाले असते शक्यशासनाकडून कृषी विभागाला शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क व्हावा यासोबतच यंत्रसामुग्री उत्पादक व शेतकरी यांच्यातही थेट संपर्क व्हावा, नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावे, हा देखील उद्देश ठेवून कृषी महोत्सव, धान्य महोत्सव यासारखे महोत्सव भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असते. त्यासाठी कृषी महोत्सवाकरीता तब्बल १५ ते १७ लाखांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र निधी उपलब्ध असतानाही केवळ कृषी विभागाने ‘नकारात्मक’ विचार केल्याने अथवा दृष्टीचा अभाव असल्याने हा महोत्सव रद्द केल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती