शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

तोंडी परीक्षा बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गुणांची होणार ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:51 IST

एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.

ठळक मुद्देनवीन बदलाचा कोणाला फायदा अन् तोटा होणार?यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल घटण्याची शक्यता

गोंडगाव, ता भडगाव, जि.जळगाव : एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.शाळांकडून आतापर्यंत हे गुण सहजपणे देण्यात यायचे. परिणामी विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. यामुळे शिक्षण तज्ज्ञांकडून यंदा निकाल घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून, घरोघरी याची प्रचिती येत आहे. शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले आहेत. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिर्वाय आहेत. मागील वर्षापर्यंत या विषयांचे मूल्यमापन हे लेखी तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. ८० गुण लेखी परीक्षेचे व २० गुण तोंडी परीक्षेचे राहायचे. यातील तोंडी परीक्षेचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात २० गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब आहे.दुसरीककडे सामाजिकशास्त्र विषयात १०० पैकी २० गुण प्रकल्पांवर आधारित असायचे. साहजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र यंदा सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व समाजिकशास्त्र हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे ८० गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहेत. साहजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगतात.यावर्षी कृतीवर आधारित प्रश्नपत्रिका आहेत. शासनाने विद्यार्थ्यांचा स्व:मताचा विचार केला असल्याने विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. तसेच ही पद्धत योग्य आहे.-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जळगावपूर्वीच्या मार्क पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. कारण सरसकट विद्यार्थ्यांना तोंडीचे पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. तो आता होणार नाही.-साहेबराव मोरे, मुख्याध्यापक, आ.बं.मुलांचे हायस्कूल, चाळीसगाव

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव