शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

तोंडी परीक्षा बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गुणांची होणार ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:51 IST

एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.

ठळक मुद्देनवीन बदलाचा कोणाला फायदा अन् तोटा होणार?यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल घटण्याची शक्यता

गोंडगाव, ता भडगाव, जि.जळगाव : एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.शाळांकडून आतापर्यंत हे गुण सहजपणे देण्यात यायचे. परिणामी विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. यामुळे शिक्षण तज्ज्ञांकडून यंदा निकाल घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून, घरोघरी याची प्रचिती येत आहे. शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले आहेत. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिर्वाय आहेत. मागील वर्षापर्यंत या विषयांचे मूल्यमापन हे लेखी तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. ८० गुण लेखी परीक्षेचे व २० गुण तोंडी परीक्षेचे राहायचे. यातील तोंडी परीक्षेचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात २० गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब आहे.दुसरीककडे सामाजिकशास्त्र विषयात १०० पैकी २० गुण प्रकल्पांवर आधारित असायचे. साहजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र यंदा सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व समाजिकशास्त्र हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे ८० गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहेत. साहजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगतात.यावर्षी कृतीवर आधारित प्रश्नपत्रिका आहेत. शासनाने विद्यार्थ्यांचा स्व:मताचा विचार केला असल्याने विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. तसेच ही पद्धत योग्य आहे.-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जळगावपूर्वीच्या मार्क पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. कारण सरसकट विद्यार्थ्यांना तोंडीचे पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. तो आता होणार नाही.-साहेबराव मोरे, मुख्याध्यापक, आ.बं.मुलांचे हायस्कूल, चाळीसगाव

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव