बंदमुळे खतांची आवक घटली

By Admin | Updated: June 17, 2014 08:36 IST2014-06-17T08:36:23+5:302014-06-17T08:36:23+5:30

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही.

Due to the closure of the fertilizers decreased | बंदमुळे खतांची आवक घटली

बंदमुळे खतांची आवक घटली

>जळगाव : रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. यात काही खते तर आलेलीच नाही. जूनमध्ये मिश्र व सरळ खतांचा मिळून एक लाख १५ हजार मे.टन एवढा पुरवठा व्हायला हवा होता. परंतु नेमका १ जूनपासून माथाडींसह रेल्वे वाहतूकदारांनी काम बंद केले. संप मागे घेतला गेला, पण अगदी सोमवारपर्यंत खते रेल्वे मालधक्क्यांवर आली नाही. यामुळे फक्त ५८ हजार ६00 मे.टन एवढाच खतांचा पुरवठा झाला. सध्या पाऊस नसल्यामुळे खतांची उलच कमी आहे, अन्यथा मोठा तुटवडा निर्माण झाला असता, याची कबुली कृषी विभागदेखील देत आहे. 
प्रमुख खतपुरवठादार कंपन्या म्हणजे आरसीएफ, इफको, कृभको, कोरोमंडल, जीएसएफसी रेल्वेद्वारे जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यांवर खते पोहोचवितात. गुजरातमधील कांडला बंदर आणि मुंबईतील प्रकल्पांमधून हे खत रेल्वेने आणले जाते. पण बंदमुळे या कंपन्यांनी खतच पाठविले नाही. येत्या दोन दिवसात खते या कंपन्यांतर्फे पाठविण्यात येतील.
 
खतांच्यासंदर्भामध्ये काही कंपन्यांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात मिश्र व सरळ खतांचा पुरवठा होणार आहे. बंदमुळे हव्या त्या प्रमाणामध्ये खतांचा पुरवठा झाला नाही. 
-सुरेंद्र पाटील, प्रभारी कृषी विकास अधिकारी (आकडे मेट्रीक टनमध्ये, खत अपेक्षित पुरवठा झालेला पुरवठा

Web Title: Due to the closure of the fertilizers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.