शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

मन्याड परिसरात दुष्काळाचे चटके तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:44 IST

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड आणि परिसरात पावसाअभावी दुष्काळाची तिव्रता वाढली असून खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. तसेच भविष्यातील चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देनदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

आडगांव ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा असून देखील नसल्यासारखी अवस्था झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकºयांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरल्याने शासनाने हा संपूर्ण परीसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.गणपती बाप्पा पावणार का?सुरवातीपासूनच पावसाने या परिसरात पाठ फिरविल्याने रोज शेतकरी या नक्षत्रात पाणी येईल, त्या नक्षत्रात पाणी येईल असे रेडीओ , टि.व्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकून आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करू लागला होता.तथापि पावसाळा संपून तीन महिने झाले तरी तिनवेळा सुध्दा परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने खरीपात लागवड केलेल्या मका, कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग या सर्व पिकांची पूर्ण वाट लागल्याने निदान गुरांचा चारा, पाणीसाठी तरी गणपती बाप्पा पावणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकºयांना पडला आहे.खरीप गेला, रब्बीची नाही आशामन्याड परिसरात खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्याचे पाहून हताश मनाने आता सर्व गेले म्हणून नशीबाला शेतकरी दोष देत आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक असल्याने खरीपच गेला वाया आता रब्बीची नाही आशा असे म्हणण्याची वेळ परीसरातील शेतकºयांवर आली आहे.पाणी व चाºयाचा प्रश्न गंभीर बनणारपरतीचा पाऊस फिरकलाच नाही तर पाणी व चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार ही वस्तुस्थिती कुणीही नाकारून चालणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ