शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मन्याड परिसरात दुष्काळाचे चटके तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:44 IST

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड आणि परिसरात पावसाअभावी दुष्काळाची तिव्रता वाढली असून खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. तसेच भविष्यातील चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देनदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

आडगांव ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा असून देखील नसल्यासारखी अवस्था झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकºयांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरल्याने शासनाने हा संपूर्ण परीसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.गणपती बाप्पा पावणार का?सुरवातीपासूनच पावसाने या परिसरात पाठ फिरविल्याने रोज शेतकरी या नक्षत्रात पाणी येईल, त्या नक्षत्रात पाणी येईल असे रेडीओ , टि.व्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकून आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करू लागला होता.तथापि पावसाळा संपून तीन महिने झाले तरी तिनवेळा सुध्दा परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने खरीपात लागवड केलेल्या मका, कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग या सर्व पिकांची पूर्ण वाट लागल्याने निदान गुरांचा चारा, पाणीसाठी तरी गणपती बाप्पा पावणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकºयांना पडला आहे.खरीप गेला, रब्बीची नाही आशामन्याड परिसरात खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्याचे पाहून हताश मनाने आता सर्व गेले म्हणून नशीबाला शेतकरी दोष देत आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक असल्याने खरीपच गेला वाया आता रब्बीची नाही आशा असे म्हणण्याची वेळ परीसरातील शेतकºयांवर आली आहे.पाणी व चाºयाचा प्रश्न गंभीर बनणारपरतीचा पाऊस फिरकलाच नाही तर पाणी व चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार ही वस्तुस्थिती कुणीही नाकारून चालणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ