शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

मन्याड परिसरात दुष्काळाचे चटके तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:44 IST

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड आणि परिसरात पावसाअभावी दुष्काळाची तिव्रता वाढली असून खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. तसेच भविष्यातील चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देनदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

आडगांव ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा असून देखील नसल्यासारखी अवस्था झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकºयांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरल्याने शासनाने हा संपूर्ण परीसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.गणपती बाप्पा पावणार का?सुरवातीपासूनच पावसाने या परिसरात पाठ फिरविल्याने रोज शेतकरी या नक्षत्रात पाणी येईल, त्या नक्षत्रात पाणी येईल असे रेडीओ , टि.व्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकून आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करू लागला होता.तथापि पावसाळा संपून तीन महिने झाले तरी तिनवेळा सुध्दा परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने खरीपात लागवड केलेल्या मका, कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग या सर्व पिकांची पूर्ण वाट लागल्याने निदान गुरांचा चारा, पाणीसाठी तरी गणपती बाप्पा पावणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकºयांना पडला आहे.खरीप गेला, रब्बीची नाही आशामन्याड परिसरात खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्याचे पाहून हताश मनाने आता सर्व गेले म्हणून नशीबाला शेतकरी दोष देत आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक असल्याने खरीपच गेला वाया आता रब्बीची नाही आशा असे म्हणण्याची वेळ परीसरातील शेतकºयांवर आली आहे.पाणी व चाºयाचा प्रश्न गंभीर बनणारपरतीचा पाऊस फिरकलाच नाही तर पाणी व चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार ही वस्तुस्थिती कुणीही नाकारून चालणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ