शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मन्याड परिसरात दुष्काळाचे चटके तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:44 IST

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड आणि परिसरात पावसाअभावी दुष्काळाची तिव्रता वाढली असून खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. तसेच भविष्यातील चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देनदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

आडगांव ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा असून देखील नसल्यासारखी अवस्था झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकºयांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरल्याने शासनाने हा संपूर्ण परीसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.गणपती बाप्पा पावणार का?सुरवातीपासूनच पावसाने या परिसरात पाठ फिरविल्याने रोज शेतकरी या नक्षत्रात पाणी येईल, त्या नक्षत्रात पाणी येईल असे रेडीओ , टि.व्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकून आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करू लागला होता.तथापि पावसाळा संपून तीन महिने झाले तरी तिनवेळा सुध्दा परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने खरीपात लागवड केलेल्या मका, कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग या सर्व पिकांची पूर्ण वाट लागल्याने निदान गुरांचा चारा, पाणीसाठी तरी गणपती बाप्पा पावणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकºयांना पडला आहे.खरीप गेला, रब्बीची नाही आशामन्याड परिसरात खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्याचे पाहून हताश मनाने आता सर्व गेले म्हणून नशीबाला शेतकरी दोष देत आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक असल्याने खरीपच गेला वाया आता रब्बीची नाही आशा असे म्हणण्याची वेळ परीसरातील शेतकºयांवर आली आहे.पाणी व चाºयाचा प्रश्न गंभीर बनणारपरतीचा पाऊस फिरकलाच नाही तर पाणी व चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार ही वस्तुस्थिती कुणीही नाकारून चालणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ