शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:00 IST

केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाचही तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आततरीही मध्यम दुष्काळी क्षेत्रात समावेश नाहीधरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसनंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलती

जळगाव : केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेल्या पैसेवारीत या वगळलेल्या पाचही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच या तालुक्यांमध्येही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते, त्यामुळे नजर पैसेवारी जाहीर करताना सर्व गावे ५० पैशांच्या वर होती. मात्र त्यानंतर पावसाअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली.मात्र केंद्र शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, पेरणीचे प्रमाण, शेतीच्या मातीतील आर्द्रता व भूजल पातळी या निकषांचा वापर केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व धरणगाव वगळता अन्य १३ तालुके या निकषांमध्ये पात्र ठरले असून त्यांना शासनाने तीव्र दुष्काळी घोषितही केले आहे. मात्र असे करताना एरंडोल व धरणगाव तालुक्यांना मध्यम दुष्काळ देखील जाहीर केलेला नाही.धरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसधरणगाव व तालुक्यात यावर्षी १२० पैकी फक्त ३० दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला व तब्बल ९० दिवसाचा पावसाचा खंड पडूनही केंद्राच्या पहिल्या कळ व दुसऱ्या कळ यादीत समाविष्ट न झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे.२९ आॅगस्ट ते २२ सप्टेंबर या दरम्यान तीन आठवड्यांचा सलग खंड पडूनही दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश झालेला नाही. कापूस, मका, ज्वारीसह इतर पिकांचे उत्पन्न फक्त २० ते २५ टक्के आहे. याची झळ शेतकºयांना बसली आहे.नंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलतीसुधारित पैसेवारी जाहीर झाल्यानंतर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैश्यांच्या आत प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ यानंतरही या तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळण्यास विलंब होणार असून दुष्काळाची सत्यता पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे तालुके दुष्काळी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगाव