शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:00 IST

केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाचही तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आततरीही मध्यम दुष्काळी क्षेत्रात समावेश नाहीधरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसनंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलती

जळगाव : केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेल्या पैसेवारीत या वगळलेल्या पाचही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच या तालुक्यांमध्येही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते, त्यामुळे नजर पैसेवारी जाहीर करताना सर्व गावे ५० पैशांच्या वर होती. मात्र त्यानंतर पावसाअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली.मात्र केंद्र शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, पेरणीचे प्रमाण, शेतीच्या मातीतील आर्द्रता व भूजल पातळी या निकषांचा वापर केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व धरणगाव वगळता अन्य १३ तालुके या निकषांमध्ये पात्र ठरले असून त्यांना शासनाने तीव्र दुष्काळी घोषितही केले आहे. मात्र असे करताना एरंडोल व धरणगाव तालुक्यांना मध्यम दुष्काळ देखील जाहीर केलेला नाही.धरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसधरणगाव व तालुक्यात यावर्षी १२० पैकी फक्त ३० दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला व तब्बल ९० दिवसाचा पावसाचा खंड पडूनही केंद्राच्या पहिल्या कळ व दुसऱ्या कळ यादीत समाविष्ट न झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे.२९ आॅगस्ट ते २२ सप्टेंबर या दरम्यान तीन आठवड्यांचा सलग खंड पडूनही दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश झालेला नाही. कापूस, मका, ज्वारीसह इतर पिकांचे उत्पन्न फक्त २० ते २५ टक्के आहे. याची झळ शेतकºयांना बसली आहे.नंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलतीसुधारित पैसेवारी जाहीर झाल्यानंतर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैश्यांच्या आत प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ यानंतरही या तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळण्यास विलंब होणार असून दुष्काळाची सत्यता पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे तालुके दुष्काळी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगाव