शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:00 IST

केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाचही तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आततरीही मध्यम दुष्काळी क्षेत्रात समावेश नाहीधरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसनंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलती

जळगाव : केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेल्या पैसेवारीत या वगळलेल्या पाचही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच या तालुक्यांमध्येही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते, त्यामुळे नजर पैसेवारी जाहीर करताना सर्व गावे ५० पैशांच्या वर होती. मात्र त्यानंतर पावसाअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली.मात्र केंद्र शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, पेरणीचे प्रमाण, शेतीच्या मातीतील आर्द्रता व भूजल पातळी या निकषांचा वापर केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व धरणगाव वगळता अन्य १३ तालुके या निकषांमध्ये पात्र ठरले असून त्यांना शासनाने तीव्र दुष्काळी घोषितही केले आहे. मात्र असे करताना एरंडोल व धरणगाव तालुक्यांना मध्यम दुष्काळ देखील जाहीर केलेला नाही.धरणगाव तालुक्यात १२० पैकी फक्त ३० दिवसच पाऊसधरणगाव व तालुक्यात यावर्षी १२० पैकी फक्त ३० दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला व तब्बल ९० दिवसाचा पावसाचा खंड पडूनही केंद्राच्या पहिल्या कळ व दुसऱ्या कळ यादीत समाविष्ट न झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे.२९ आॅगस्ट ते २२ सप्टेंबर या दरम्यान तीन आठवड्यांचा सलग खंड पडूनही दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश झालेला नाही. कापूस, मका, ज्वारीसह इतर पिकांचे उत्पन्न फक्त २० ते २५ टक्के आहे. याची झळ शेतकºयांना बसली आहे.नंदुरबारमध्ये दोन तालुक्यांना हव्यात सवलतीसुधारित पैसेवारी जाहीर झाल्यानंतर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैश्यांच्या आत प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ यानंतरही या तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळण्यास विलंब होणार असून दुष्काळाची सत्यता पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे तालुके दुष्काळी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :droughtदुष्काळJalgaonजळगाव